शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेला मैत्रीपूर्ण लढत देणार; बंडखोरीचा सांगली पॅटर्न राबविण्याची तयारी
2
शिंदे विमानात, निरोपाची गल्लत अन् दिल्लीत न झालेली बैठक; दोन उपमुख्यमंत्री राजधानीत मुक्कामी
3
IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना आजपासून; खेळपट्टी ठरवणार कसोटी मालिकेचे भवितव्य
4
आजचे राशीभविष्य : प्रवास किंवा सहलीची शक्यता, आज काही आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता
5
दिवाळी स्पेशल!! ब्रुनो, कुकी, मिश्टी, मायलोच्या अंगावर दिसणार ब्लेझर, जॅकेट अन् फ्रॉक
6
राज'पुत्रा'समोर दोन्ही सेनेचे आव्हान; अमित ठाकरेंची माहीममधील लढत रंगतदार होणार!
7
फॉर्म्युल्यात ८५चे समान 'चित्र'! प्रत्यक्षात काँग्रेस १०३, उद्धवसेना ९४, शरद पवार गट ८४!
8
धनत्रयोदशीला धनवर्षाव: ९ राजयोग, ९ राशींवर लक्ष्मी प्रसन्न; ऐश्वर्य, वैभवाचे वरदान, शुभ-लाभ!
9
"प्रथमच स्वतःसाठी मागतेय मते"; प्रियांका गांधी यांनी वायनाड मधून भरला उमेदवारी अर्ज
10
गुरुपुष्य योग: स्वामी महाराजांच्या पूजेनंतर आवर्जून म्हणा प्रदक्षिणा अन् आरती गुरुवारची
11
ताशी १२० किमीने धडकणार 'दाना' चक्रीवादळ; पावसाला सुरुवात, ३५० रेल्वे रद्द
12
विधानसभा निवडणूक: ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघांत 'काँटे की टक्कर'ची शक्यता
13
परस्परांविरोधात प्रचार करणार? संदीप नाईक यांच्या उमेदवारीमुळे गणेश नाईकांपुढे पेच
14
ठाणे मतदारसंघात शिंदेसेनेची भाजपच्या विरोधात बंडखोरी; पाचपाखाडी मतदारसंघावर दावा
15
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
16
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
17
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
18
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
19
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
20
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक

अनेक वर्षे होती सत्ता, पण या राज्यात काँग्रेसला उमेदवार मिळेनात, ४१ जागांवर केलं सरेंडर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2024 9:05 AM

Arunachal Pradesh Assembly Election 2024: अरुणाचल प्रदेशमध्ये अनेक वर्षे सत्ता असणाऱ्या काँग्रेसची यावेळी बिकट अवस्था झाली असून, पक्षाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.  एवढंच नाही तर काँग्रेसला (Congress) ४१ जागांवर निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारच मिळाले नाहीत, अशी माहिती आता समोर आली आहे. 

देशातील लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर होणार आहे. दरम्यान, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या दोन राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल मात्र रविवारीच जाहीर झाला असून, त्यापैकी अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाने ६० पैकी ४६ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला आहे. मागच्या वेळपेक्षा भाजपाला काही जागा अधिक मिळाल्या आहेत. मात्र दुसरीकडे अरुणाचल प्रदेशमध्ये अनेक वर्षे सत्ता असणाऱ्या काँग्रेसची यावेळी बिकट अवस्था झाली असून, पक्षाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.  एवढंच नाही तर काँग्रेसला ४१ जागांवर निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारच मिळाले नाहीत, अशी माहिती आता समोर आली आहे. 

२०१९ मध्ये काँग्रेसने अरुणाचल प्रदेशमध्ये ४ जागांवर विजय मिळवला होता. मात्र यावेळी काँग्रेसला राज्यातील ६० पैकी केवळ १९ जागांवरच निवडणूक लढवता आली. याबाबत समोर येत असलेल्या कारणांनुसार पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारांना नॉमिनेट करण्याच्या पक्षाच्या निर्णयाचं उल्लंघन केलं. तर अनेक काँग्रेस नेत्यांनी ऐनवेळी निवडणुकीच्या आखाड्यातून पळ काढला. अनेकजण भाजपामध्ये गेले. मात्र काँग्रेसने पूर्व कामेंग जिल्ह्यातील बामेंग विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिलेले  कुमार वाय हे विजय मिळवण्यात यशस्वी ठरले. या निवडणुकीत काँग्रेसचे विजयी झालेले ते एकमेव उमेदवार ठरले. 

दरम्यान, काँग्रेसने अरुणाचल प्रदेशमधील निवडणुकीसाठी ३५ उमेदवारांची यादी तयार केली होती. मात्र यामधील १० जणांनी उमेदवारी अर्च भरला नाही. उर्वरित उमेदवारांपैकी ५ जणांनी आपली उमेदवारी मागे घेतली. कानुबारी लोकसभा मतदारसंघातील सोम्फा वांगसा यांनी उमेदवारी अर्जाची छाननी झाल्यानंतर उमेदावारी मागे घेत भाजपामध्ये प्रवेश केला. दरम्यान, भाजपासोबत कथितपणे हातमिळवणी केल्याच्या आरोपामुळे काँग्रेसने अनेक नेत्यांना पक्षातून बाहेरची वाट दाखवली. यामधील ९ जणांची उमेदवारी निश्चित करण्यात आली होती. मात्र त्यांनी निवडणूक लढवली नाही. 

दरम्यान, काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, आपण निवडणूक लढवत नसल्याचे या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक लढवत नसल्याची कल्पना पक्षाला दिली नाही. अखेरपर्यंत ते उमेदवारीसाठी झगडत होते. मात्र नंतर त्या्ंनी माघार घेतली. दरम्यान, अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री नाबाम तुकी यांनी उमेदवारांच्या माघारीसाठी धनशक्ती कारणीभूत असल्याचा दावा केला आहे. आम्ही नक्कीच निराश झालोय. मात्र हताश झालेलो नाहीत. आम्ही पराभवाच्या कारणांचं आत्मपरीक्षण करू. तसेच पुन्हा एकदा पक्ष संघटनेवर काम करू, असे ते म्हणाले. 

टॅग्स :arunachal pradesh lok sabha election 2024अरुणाचल लोकसभा निवडणूक निकाल २०२४congressकाँग्रेसElectionनिवडणूक 2024