शहरं
Join us  
Trending Stories
1
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
8
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
9
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
10
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
11
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
13
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
15
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
16
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
17
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
18
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
19
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
20
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता

अनेक वर्षे होती सत्ता, पण या राज्यात काँग्रेसला उमेदवार मिळेनात, ४१ जागांवर केलं सरेंडर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 10:57 IST

Arunachal Pradesh Assembly Election 2024: अरुणाचल प्रदेशमध्ये अनेक वर्षे सत्ता असणाऱ्या काँग्रेसची यावेळी बिकट अवस्था झाली असून, पक्षाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.  एवढंच नाही तर काँग्रेसला (Congress) ४१ जागांवर निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारच मिळाले नाहीत, अशी माहिती आता समोर आली आहे. 

देशातील लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर होणार आहे. दरम्यान, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या दोन राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल मात्र रविवारीच जाहीर झाला असून, त्यापैकी अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाने ६० पैकी ४६ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला आहे. मागच्या वेळपेक्षा भाजपाला काही जागा अधिक मिळाल्या आहेत. मात्र दुसरीकडे अरुणाचल प्रदेशमध्ये अनेक वर्षे सत्ता असणाऱ्या काँग्रेसची यावेळी बिकट अवस्था झाली असून, पक्षाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.  एवढंच नाही तर काँग्रेसला ४१ जागांवर निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारच मिळाले नाहीत, अशी माहिती आता समोर आली आहे. 

२०१९ मध्ये काँग्रेसने अरुणाचल प्रदेशमध्ये ४ जागांवर विजय मिळवला होता. मात्र यावेळी काँग्रेसला राज्यातील ६० पैकी केवळ १९ जागांवरच निवडणूक लढवता आली. याबाबत समोर येत असलेल्या कारणांनुसार पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारांना नॉमिनेट करण्याच्या पक्षाच्या निर्णयाचं उल्लंघन केलं. तर अनेक काँग्रेस नेत्यांनी ऐनवेळी निवडणुकीच्या आखाड्यातून पळ काढला. अनेकजण भाजपामध्ये गेले. मात्र काँग्रेसने पूर्व कामेंग जिल्ह्यातील बामेंग विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिलेले  कुमार वाय हे विजय मिळवण्यात यशस्वी ठरले. या निवडणुकीत काँग्रेसचे विजयी झालेले ते एकमेव उमेदवार ठरले. 

दरम्यान, काँग्रेसने अरुणाचल प्रदेशमधील निवडणुकीसाठी ३५ उमेदवारांची यादी तयार केली होती. मात्र यामधील १० जणांनी उमेदवारी अर्च भरला नाही. उर्वरित उमेदवारांपैकी ५ जणांनी आपली उमेदवारी मागे घेतली. कानुबारी लोकसभा मतदारसंघातील सोम्फा वांगसा यांनी उमेदवारी अर्जाची छाननी झाल्यानंतर उमेदावारी मागे घेत भाजपामध्ये प्रवेश केला. दरम्यान, भाजपासोबत कथितपणे हातमिळवणी केल्याच्या आरोपामुळे काँग्रेसने अनेक नेत्यांना पक्षातून बाहेरची वाट दाखवली. यामधील ९ जणांची उमेदवारी निश्चित करण्यात आली होती. मात्र त्यांनी निवडणूक लढवली नाही. 

दरम्यान, काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, आपण निवडणूक लढवत नसल्याचे या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक लढवत नसल्याची कल्पना पक्षाला दिली नाही. अखेरपर्यंत ते उमेदवारीसाठी झगडत होते. मात्र नंतर त्या्ंनी माघार घेतली. दरम्यान, अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री नाबाम तुकी यांनी उमेदवारांच्या माघारीसाठी धनशक्ती कारणीभूत असल्याचा दावा केला आहे. आम्ही नक्कीच निराश झालोय. मात्र हताश झालेलो नाहीत. आम्ही पराभवाच्या कारणांचं आत्मपरीक्षण करू. तसेच पुन्हा एकदा पक्ष संघटनेवर काम करू, असे ते म्हणाले. 

टॅग्स :arunachal pradesh lok sabha election 2024अरुणाचल लोकसभा निवडणूक निकाल २०२४congressकाँग्रेसElectionनिवडणूक 2024