शहरं
Join us  
Trending Stories
1
"अक्षय शिंदेचा एन्काऊंटर मोठं षडयंत्र, कोणालातरी वाचवाय..."; संजय राऊतांनी प्रश्न उपस्थित केले
2
मोठी बातमी: सगेसोयरे अधिसूचनेची लवकरच अंमलबजावणी?; बैठकीनंतर शंभूराज देसाईंनी दिली माहिती
3
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
4
पितृपक्षानंतर मोठा निर्णय घेणार, हर्षवर्धन पाटील यांनी दिले स्पष्ट संकेत
5
MPSC विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश: कृषी सेवेतील पदांचा समावेश करत पूर्व परीक्षेची नवी तारीख आयोगाकडून जाहीर
6
MobiKwik IPO: ₹७००००००००० उभारण्याची तयारी; मोबिक्विकच्या आयपीओला सेबीचा हिरवा झेंडा
7
थरकाप उडवणारं हत्याकांड! कोण होती महालक्ष्मी?, जिचं मुंडकं फ्रीजमध्ये सापडलं
8
Success Story: पुण्यात जन्म, भारतात यश मिळालं नाही; अमेरिकेची वाट धरली, आता आहेत ६४,३२५ कोटींचे मालक
9
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
10
प्रयागराजमध्ये महाबोधी एक्सप्रेसवर दगडफेक, अनेक प्रवासी जखमी
11
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
12
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
13
अधिकाऱ्यांच्या असहकारावरून मुनगंटीवार ‘कॅबिनेट’मध्ये भडकले
14
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
16
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
17
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
18
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
19
‘एसटी’च्या ३९ जमिनी ६० वर्षांच्या लीजवर देणार; ३० वर्षांसाठी प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय
20
सिडकोची गोड बातमी : दसऱ्याआधी निवडा तुमच्या आवडीचे घर

अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग, भारताचं चीनला प्रत्युत्तर

By admin | Published: April 20, 2017 8:58 PM

चीनकडून अरुणाचल प्रदेशमधल्या सहा ठिकाणांची नावं बदलल्यानंतर भारतानं चीनला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 20 - चीनकडून अरुणाचल प्रदेशमधल्या सहा ठिकाणांची नावं बदलल्यानंतर भारतानं चीनला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. नाव बदलल्यानं खरी परिस्थिती बदलत नसते, असा उपरोधिक टोला भारतानं चीनला लगावला आहे. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि कायम राहील, असंही भारतानं चीनला ठणकावलं आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले यांनी सांगितलं की, चीन सरकारशी आतापर्यंत कोणतीही बातचीत झाली नाही. दोन्ही देशांतील सीमेचा वाद सोडवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये वेगवेगळी व्यवस्था बनवण्यात आली आहे. आम्हाला आशा आहे की, दोन्ही देशांसाठी यथोचित तोडगा निघेल. तर दुसरीकडे बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांच्या अरुणाचल प्रदेशच्या दौ-यानंतर भडकलेल्या चीननं भारताच्या ताब्यातील अरुणाचल प्रदेशमधील सहा ठिकाणांची नावं बदलली आहेत. तसेच चीनच्या महत्त्वाकांक्षी वन बेल्ट वन रोड प्रकल्पाच्या बैठकीसाठी आम्हाला निमंत्रण मिळाल्यास आम्ही त्याचा विचार करू, असंही गोपाल बागले यांनी सांगितलं आहे. चीननं पहिल्यांदाच मानकीकृत अधिकारांनी अरुणाचल प्रदेशमधील सहा ठिकाणांचं नामकरण केलं आहे. चीनच्या मंत्रालयानं 14 एप्रिलला याची घोषणा केली होती. त्यांनी चिनी सरकारच्या नियमांनुसार दक्षिण तिबेट (अरुणाचल प्रदेश)च्या सहा ठिकाणांच्या नावांना चिनी, तिबेट आणि रोमन वर्णांनुसार मानकीकृत केलं होतं. या सहा ठिकाणांचं वोग्यानग्लिंग, मिला री, क्वीडेंगार्बो री, मेन्क्‍युका, बुमो ला आणि नामकापुब री असं रोमन वर्णांनुसार नामकरण केलं होते. भारत ज्या भूभागाला "अरुणाचल प्रदेश" असे संबोधतो त्या "दक्षिण तिबेट" येथील सहा ठिकाणांना चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने रोमन भाषेतील वर्णानुसार नावे दिली आहेत", असे वृत्त चीनमधील ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्राने दिले होते. भारत-चीनदरम्यानच्या 3 हजार 488 किलोमीटरवरील प्रत्यक्ष सीमारेषेवरून दोन्ही देशात वाद आहेत. भारताच्या अरुणाचल प्रदेशला चीनकडून दक्षिण तिबेट संबोधले जाते.