शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

अरुणाचल आमचाच, चीनला सुनावले खडे बोल; केंद्र सरकारने फटकारले, आक्षेप फेटाळून लावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 05:30 IST

अरुणाचल प्रदेशचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात दौरा केला होता. अरुणाचल प्रदेश आमचा असून, भारताच्या हालचालींमुळे हा प्रश्न आणखी जटिल होणार आहे, असेही चीनने म्हटले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशच्या नुकत्याच केलेल्या दौऱ्यावर चीनने आक्षेप घेतला होता. या भूमिकेबद्दल भारताने चीनने खडे बोल सुनावले आहेत. अरुणाचल हा भारताचाच अविभाज्य भाग होता व भविष्यातही तो राहील, असे केंद्र सरकारने चीनला ठणकावून सांगितले आहे. 

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, अरुणाचल प्रदेश हा आमचाच अविभाज्य भाग आहे ही भारताची ठाम भूमिका आहे व ती वेळोवेळी चीनला सांगण्यात आली आहे. या भारताच्या नेत्यांनी केलेला दौरा किंवा त्या भागात केलेली विकासकामे यांना चीन नेहमी आक्षेप घेतो. 

अरुणाचल प्रदेशचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात दौरा केला होता. अरुणाचल प्रदेश आमचा असून, भारताच्या हालचालींमुळे हा प्रश्न आणखी जटिल होणार आहे, असेही चीनने म्हटले होते. अरुणाचल प्रदेश म्हणजे दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा दावा चीनने सातत्याने केला आहे.

‘चीनने काहीही म्हटले, तरी वस्तुस्थिती बदलणार नाही’

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, चीनने काहीही आक्षेप घेतले तरी वस्तुस्थिती काही बदलणार नाही. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे व तो कायम राहील. भारतातील नेते अन्य राज्यांप्रमाणे अरुणाचल प्रदेशचाही दौरा करत असतात.

‘तणावामुळे कोणाचाच फायदा झाला नाही’

नवी दिल्ली : पूर्व लडाखमधील सीमाप्रश्नावरून भारत व चीनमध्ये गेल्या चार वर्षांपासून तणाव निर्माण झाला आहे. त्याचा दोन्ही देशांना काहीही फायदा झालेला नाही, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले. 

या सीमाप्रश्नावर योग्य तोडगा काढण्यासाठी भारत कटिबद्ध आहे. मात्र, या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी दोन्ही देशांनी परस्परांचा सन्मान राखून करार करायला हवा व नियंत्रण रेषेला मान्यता द्यायला हवी, असे एस. जयशंकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :Arunachal Pradeshअरुणाचल प्रदेशNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार