शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

एका व्यक्तीला एकदाच पंतप्रधानपद; अरुंधती रॉय यांच्या सूचनेवरून वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2021 06:16 IST

दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात पोलिसांनी केलेल्या अत्याचाराला दोन वर्षे झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात अरुंधती रॉय यांचे भाषण झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : एका व्यक्तीला एकदाच पंतप्रधानपद भूषविता येईल, अशी तरतूद करण्याची गरज  आहे,  अशी सूचना प्रसिद्ध लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या अरुंधती रॉय यांनी केली आहे. यावरून आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.

दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात पोलिसांनी केलेल्या अत्याचाराला दोन वर्षे झाल्याच्या निमित्ताने प्रेस  क्लब ऑफ इंडियामध्ये आयोजित कार्यक्रमात अरुंधती रॉय यांचे भाषण झाले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, राजा-महाराजांचा जमाना आता संपला आहे. एका व्यक्तीला एकदाच पंतप्रधानपद भूषविता आले पाहिजे. एकदा हे पद भूषविल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीला या पदावर काम करण्याची संधी द्यायला हवी. यावेळी त्यांनी कुणाही व्यक्तीचे नाव घेतले नाही. त्या म्हणाल्या, मोदी सरकारने दहशतवादाची व्याख्या बदलली असून सुधा भारद्वाज, आनंद तेलतुंबडे, गौतम नवलखा सारख्या बुद्धिजीवींना दहशतवादी ठरविले आहे. यूएपीए या कायद्याचा दुरुपयोग करून निरपराध व्यक्तींना अनेक महिन्यांपासून तुरुंगात कोंडले.

या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवावा लागेल, ज्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे कृषी कायदे मागे घ्यावे लागले त्याचप्रमाणे एनआरसीचा कायदाही मागे घ्यावा लागेल, असेही त्या म्हणाल्या. यावेळी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थी उपस्थित होते.   

टॅग्स :prime ministerपंतप्रधानCentral Governmentकेंद्र सरकार