शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

लातूरला पाणीपुरवठा करण्यासाठी अरविंद केजरीवाल सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2016 2:00 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून केजरीवालांनी मराठवाड्याला पुढील 2 महिने 10 लाख लीटर पाणीपुरवठा करण्याची तयारी दर्शवली आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. १२ - दुष्काळग्रस्त मराठवाड्याला पाणीपुरवठा करण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पुढे सरसावले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून केजरीवालांनी मराठवाड्याला पुढील 2 महिने 10 लाख लीटर पाणीपुरवठा करण्याची तयारी दर्शवली आहे. केजरीवाल यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं लातूरमधील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी घेत असलेल्या प्रयत्नांचं कौतुकही केलं आहे. दुष्काळग्रस्त जिल्ह्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मदत करण्याचं आवाहन केजरीवालांनी यावेळी केलं आहे.
 
अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवलेलं पत्र शेअर केलं आहे. ज्यामध्ये केंद्रांच्या प्रयत्नांच कौतुक करत आपणही मदत करण्यासाठी इच्छुक असल्याचं लिहिलं आहे. '21व्या शतकात पाण्याच्या अभावामुळे जर कोणाचा मृत्यू झाला तर आपल्या सगळ्यांसाठी ही लाजीरवाणी गोष्ट असेल. या परिस्थितीत लातूरला मदत करणं सर्व देशवासीयांचं कर्तव्य असल्याचंही', केजरीवाल यांनी लिहिलं आहे.
यावेळी केजरीवाल यांनी दिल्लीतदेखील पाण्याची कमतरता असल्याचं मान्य केलं आहे. मात्र लातूरमधील भयानक परिस्थिती पाहता त्यांना मदत करण आपलं कर्तव्य असल्याचं केजरीवाल यांनी म्हंटलं आहे. इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहून मदतीचं आवाहन करण्यात याव असं केजरीवालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सुचवलं आहे.
 
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दिक्षित यांनी मात्र केजरीवालांचा हा स्टंट असल्याची टीका केली आहे. ‘त्यांनी प्रथम दिल्लीची तहान भागवावी. दिल्लीतील अनेक भागात लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. प्रथम दिल्लीतील लोकांना पाणी द्या. त्यानंतर लातूरविषयी बोला', असं शीला दिक्षित बोलल्या आहेत.