शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
2
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
3
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
4
Bihar Politics : नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी; JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा
5
अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड
6
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
7
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
8
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
9
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
10
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
11
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
12
Kolkata Doctor Case : "२४ तासांत मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण करू", डॉक्टरांचा ममता सरकारला अल्टिमेटम
13
Navratri Puja Vidhi 2024: इच्छित मनोकामनापूर्ती करणारे 'काम्य व्रत' ललिता पंचमीला कसे करायचे? वाचा!
14
'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट
15
माजी खासदाराची शरद पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी; अवघ्या २ वर्षात परतले माघारी
16
१० मिनिटांत घरी पोहोचणार गरमागरम जेवण, Swiggy नं सुरू केली नवी सेवा; मुंबई-पुण्यासह 'या' ठिकाणी घेता येणार लाभ
17
Navratri Special : "शेतकरी नवरा नको गं बाई" हा दृष्टिकोन बदलण्याची गरज, अभिनेत्री असलेली मृण्मयी शेतीकडे का वळली?
18
Bigg Boss 18 ची उत्सुकता शिगेला! सलमानने डॅशिंग एन्ट्री घेऊन दाखवला अनोखा अंदाज, बघा व्हिडीओ
19
अहमदनगर शहराचे नाव 'अहिल्यानगर'; जिल्ह्याचे नाव राहणार तेच; सरकारी आदेश जारी
20
Jio Financial ला SEBI नं दिली गूड न्यूज, आता शेअरवर नजर; काय परिणाम होणार?

"प्रचार करताना तर काहीच त्रास झाला नाही, मग ..."; केजरीवालांच्या तब्येत ठीक नसल्याच्या दाव्यावर EDचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 5:19 PM

सुप्रीम कोर्टाने दिल्लीचे मुख्ममंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलेल्या दिलाशाचा वेळ संपत आला आहे. दुसरीकडे आता केजरीवालांच्या याचिकेवर ईडीने प्रत्युत्तर दिले आहे.

Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आता पुन्हा कोर्टात धाव घेत दिलासा मागितला आहे. अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी दिल्लीच्या ट्रायल कोर्टात कथित मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात नियमित जामीन मागितला आहे. यासोबत केजरीवाल यांनी वैद्यकीय कारणास्तव सात दिवसांच्या अंतरिम जामीनासाठीही याचिका कोर्टात दाखल केली. सुप्रीम कोर्टाने तात्काळ सुनावणीस नकार दिल्याने केजरीवाल यांनी राऊस एव्हेन्यू येथील ट्रायल कोर्टात या याचिका दाखल केल्या होत्या. दुसऱ्या याचिकेत त्यांनी प्रकृतीचे कारण देत सात दिवसांचा अंतरिम जामीन मागितला आहे. दुसरीकडे  विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी नोटीस जारी करून दोन्ही याचिकांवर अंमलबजावणी संचालनालयाकडून उत्तर मागितले आहे.

राऊस एव्हेन्यू कोर्टाच्या विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी नोटीशीद्वारे  केजरीवाल यांनी नियमित जामीन तसेच अंतरिम जामीनासाठी दाखल केलेल्या याचिकेवर अंमलबजावणी संचालनालयचे उत्तर मागितले होते.  ईडीतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसव्ही राजू यांनी याचिकांवर उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागितला आहे. ईडीची मागणी मान्य करत कोर्टाने याप्रकरणाची पुढील सुनावणी १ जून रोजी ठेवली. केजरीवाल यांना ट्रायल कोर्टातून दिलासा न मिळाल्यास त्यांना २ जून रोजी आत्मसमर्पण करून तुरुंगात जावं लागणार आहे. सुप्रीम कोर्टाने केजरीवाल यांना निवडणूक प्रचारात भाग घेण्यासाठी २१ दिवसांचा दिलासा दिला आहे. त्यानंतर केजरीवाल यांनी तब्येत बिघडल्याचे सांगून केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे जामिनाची मुदत ७ दिवसांनी वाढवण्याची मागणी केली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने तात्काळ सुनावणी करण्यास नकार दिला. यानंतर केजरीवाल यांनी ट्रायल कोर्टात धाव घेतली आहे होती.

या याचिकेला ईडीने विरोध करताना प्रचार करताना केजरीवाल यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसल्याचे म्हटलं आहे. तसेच या प्रकरणात अनेक पद्धतीने दडपशाही होत आहे जी आम्ही रेकॉर्डवर आणू इच्छित आहेत, असेही ईडीने म्हटलं आहे. “ते सध्या कोठडीत नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता. ते आज पंजाबमध्ये प्रचार करत आहेत. त्यांची तब्येत त्यांना प्रचारापासून थांबवत नाहीये. आम्हाला फार कमी वेळ मिळावा म्हणून ते शेवटच्या क्षणी जामिनासाठी आले आहेत. त्यांचे आजचे वर्तन कोणत्याही न्यायास पात्र नाही,” असे एसव्ही राजू यांनी म्हटलं.

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी वजन अचानक कमी होऊ लागल्याने किडनी खराब होणे, गंभीर हृदयरोग आणि कर्करोगासारखी लक्षण असल्याचे म्हणत पीईटी सीटी स्कॅनसह इतर वैद्यकीय चाचण्यांसाठी सात दिवसांसाठी अंतरिम जामीन वाढवून मागितला होता. मात्र सुप्रीम कोर्टाने त्यावर तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला. त्यानंतर केजरीवाल यांनी दिल्ली ट्रायल कोर्टात धाव घेतली. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयdelhiदिल्लीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय