शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
5
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
6
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
7
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
8
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
9
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
10
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
11
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
12
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
13
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
14
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
15
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
16
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
17
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
18
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
20
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'

Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 11:25 IST

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत मोठा दावा केला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. "भाजपाने निवडणुकीत विजय मिळवला तर अमित शाह यांना पंतप्रधान केलं जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शाह यांच्यासाठी मतं मागत आहेत. भाजपा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दोन महिन्यांत त्यांच्या पदावरून हटवणार आहे" असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. 

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेत असताना अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, "भाजपाचा संविधान बदलण्याचा मानस आहे, त्यामुळेच 400 जागांचा नारा दिला जात आहे. मात्र, संविधानाचे रक्षण करणारा पक्ष असल्याचं भाजपाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. पंतप्रधान मोदींनी निवडणूक जिंकल्यास ते पाच वर्षे पंतप्रधान राहतील." 

"यूपीच्या मतदारांना इंडिया आघाडीला मतदान करण्याची विनंती करण्यासाठी मी आज लखनौमध्ये आलो आहे. मला येथे चार मुद्द्यांवर बोलायचं आहे. प्रथम या निवडणुकीत पंतप्रधान मोदी अमित शाह यांना पंतप्रधान करतील. दुसरं म्हणजे, भाजपा सत्तेत आल्यास 2-3 महिन्यांत मुख्यमंत्री पदावरून हटवलं जाईल. तिसरं - ते संविधान बदलणार आहेत आणि चौथं म्हणजे ते SC आणि ST चं आरक्षण हटवणार आहेत" असंही केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

केजरीवाल यांनी केली मोदींच्या निवृत्तीची भविष्यवाणी

केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींच्या निवृत्तीचीही भविष्यवाणी केली. ते म्हणाले, "पंतप्रधान मोदी 17 सप्टेंबर 2025 रोजी 75 वर्षांचे होतील. मोदींनी 17 सप्टेंबर 2025 रोजी अमित शाह यांना पंतप्रधान बनवण्याचा निर्णय घेतला आहे. 75 वर्षांनंतर ते निवृत्त होणार नाहीत असं पंतप्रधानांनी अद्याप सांगितलेलं नाही. मोदींनी हा नियम बनवला आहे आणि मला पूर्ण आशा आहे की ते या नियमाचं पालन करतील."

"भाजपाला 220 पेक्षा कमी जागा मिळतील"

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी भाजपाला किती जागा मिळतील हेही सांगितलं. "भाजपाला 220 पेक्षा कमी जागा मिळतील असं म्हटलं आहे. हरियाणा, दिल्ली, पंजाब, कर्नाटक, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, यूपी, बिहार, झारखंड आणि राजस्थानमध्ये त्यांच्या जागा कमी होणार आहेत. भाजपा सत्ता स्थापन करणार नाही. इंडिया आघाडी सरकार स्थापन करणार आहे" असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAmit Shahअमित शाहyogi adityanathयोगी आदित्यनाथNarendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४