शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूमध्ये बसपा प्रदेशाध्यक्ष आर्मस्ट्राँग यांच्यावर हल्ला, 6 आरोपींनी घरासमोरच केली हत्या
2
"सरकार आणि मनोज जरांगे यांच्यात समन्वय आवश्यक, हा विषय लवकर संपवा"; चव्हाण, भुमरे, जरांगे यांच्यात दोन तास चर्चा
3
मोठी बातमी! अशोक चव्हाण अन् संदिपान भुमरे अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंच्या भेटीला...
4
'सूर्याचा कॅच अन् आम्ही 50 जणांनी 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट', CM शिंदेंची तुफान फटकेबाजी
5
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संघ मुख्यालयात, सरसंघचालकांसोबत चर्चा
6
“मुंबईत १ लाख लोक मावतील एवढे स्टेडियम व्हावे”; फडणवीसांची रोहित शर्मा समोरच मागणी
7
Anant Ambani And Radhika Merchant Wedding : धोनी आणि साक्षीची 'संगीत समारंभा'ला हजेरी, Video
8
Rohit Sharma Suryakumar Yadav, Maharashtra Vidhan Bhavan Felicitation: "तर मी सूर्याला बसवलं असतं.."; विधानभवनात रोहित शर्माची तुफान बॅटिंग, सभागृहात पिकला हशा
9
Belly Fat: 15 दिवसांत आत जाईल बाहेर आलेलं पोट! नॅच्युरोपॅथी तज्ज्ञांनी सांगितला 'रामबाण' घरगुती उपाय
10
“विधान परिषद निवडणुकीत आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील, शंखनाद सभा घेणार”: नाना पटोले
11
CM शिंदेंच्या नातवाशी रंगला रोहित शर्माचा लडिवाळ संवाद... पाहा आजच्या कार्यक्रमाचे Photos
12
या पेनी स्टॉकवर LIC सह अनेक बँका 'फिदा'; 17 दिवसांत दुप्पट केला पैसा! किंमत 5 रुपयांपेक्षाही कमी
13
लोकसभा निकालाचा परिणाम की...? भाजपनं अनेक राज्यांत नियुक्त केले नवे प्रभारी
14
टीम इंडियाला महाराष्ट्र सरकारकडून ११ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर; मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
15
"ऑगस्ट महिन्यात कोसळणार मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार’’, इंडिया आघाडीतील बड्या नेत्याचा दावा 
16
Video: 'माझ्याबद्दल खुप वाईट बोललं गेलं, पण मी...' PM मोदींसमोर हार्दिकने मांडल्या वेदना
17
कॅच हातात बसला, आपण आणखी एक वर्ल्डकप जिंकू; सूर्याचे विधानसभेला मराठीतून आश्वासन
18
मुख्यमंत्र्यांची भेट, नंतर प्रकाश आंबेडकरांची वसंत मोरेंवर टीका; म्हणाले तीन विषयांवर चर्चा...
19
“ओबीसी एकत्र आहोत, मनोज जरांगेंच्या पाडापाडीला आमच्या शुभेच्छा”; लक्ष्मण हाकेंचा पलटवार
20
'मुंबईकर' वर्ल्ड चॅम्पियन्स मुख्यमंत्र्यांच्या भेटीला! रोहित, सूर्या, दुबे, यशस्वी यांचा 'वर्षा'वर सत्कार

'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2024 5:34 PM

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या 21 दिवसांच्या अंतरिम जामिनाची मुदत संपल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी आज तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केले.

Arvind Kejriwal surrender : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या 21 दिवसांच्या अंतरिम जामिनाची मुदत संपल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज तिहार तुरुंगात अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केले. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. "आम आदमी पार्टी महत्त्वाची नाही, देश महत्त्वाचा आहे. देश वाचवण्यासाठी मी तुरुंगात जात आहोत. मी हुकूमशाहीविरोधात आवाज उठवला आहे, म्हणून मला कोणत्याही पुराव्याशिवाय तुरुंगात टाकले, ही हुकूमशाही आहे," अशी टीका केजरीवालांनी केली.

ते पुढे म्हणतात, "ही निवडणूक देश आणि लोकशाही वाचवण्यासाठी आहे. एक्झिट पोलबद्दल घाबरण्याची गरज नाही, ते सर्व खोटे आहेत. भाजपला जास्त जागा दाखवण्याचे आदेश वरुन आले असतील. त्या बनावट एक्झिट पोलवर विश्वास ठेवू नका, विजय आपलाच होणार आहे. आपल्या प्रत्येकाला लढायचे आहे. ही निवडणूक कोणत्याही विशिष्ट व्यक्तीसाठी नाही, ही निवडणूक या देशाला वाचवण्यासाठी आहे. भगतसिंग म्हणाले होते की, जेव्हा सत्ता हुकूमशाही बनते, तेव्हा जेल ही जबाबदारी असते. तुरुंगात ते माझ्यासोबत काय करतील माहीत नाही. भगतसिंग यांना फाशी झाली, ते मलादेखील फाशी द्यायला कमी करणार नाहीत."

"मला माहित नाही की, मी तुरुंगातून परत कधी येईन. पण माझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब देशासाठी आहे. ईव्हीएमवर लक्ष ठेवा, उमेदवार हरला तरी तुम्ही तिथेच रहा. व्हीव्हीपीएटी स्लिप मशीनशी जुळली नाही, तर निवडणूक रद्द होते. आपण सतर्क राहिले पाहिजे. दाखवण्यात आलेले एक्झिट पोल खोटे आहेत. आम्ही 100 कोटींची लाच घेतली असेल, तर ते पैसे गेले कुठे? त्यांना आमच्याकडून एक रुपयाही मिळाला नाही. देशाच्या इतिहासात सर्वाधिक बहुमताने आलेल्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांना कोणत्याही पुराव्याशिवाय तुरुंगात टाकण्यात आले," असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.

ते पुढे म्हणतात, "त्याच्या मित्रांनी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले आहेत, एक्झिट पोलनंतर बाजार वर जाईल आणि ते पैसे कमावू शकतील, त्यामुळे खोटे एक्झिट पोल दाखवले जात आहेत. हे लोक अधिकाऱ्यांवर दबाव आणून त्यांची हेराफेरी करू शकतात. म्हणूनच मी इंडिया आघाडीच्या सर्व पक्षांना सांगू इच्छितो की, अंतिम मतमोजणी होईपर्यंत तिथेच रहा, जेणेकरून ते फेरफार करू शकणार नाहीत.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४AAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपा