शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2024 17:37 IST

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या 21 दिवसांच्या अंतरिम जामिनाची मुदत संपल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी आज तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केले.

Arvind Kejriwal surrender : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या 21 दिवसांच्या अंतरिम जामिनाची मुदत संपल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज तिहार तुरुंगात अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केले. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. "आम आदमी पार्टी महत्त्वाची नाही, देश महत्त्वाचा आहे. देश वाचवण्यासाठी मी तुरुंगात जात आहोत. मी हुकूमशाहीविरोधात आवाज उठवला आहे, म्हणून मला कोणत्याही पुराव्याशिवाय तुरुंगात टाकले, ही हुकूमशाही आहे," अशी टीका केजरीवालांनी केली.

ते पुढे म्हणतात, "ही निवडणूक देश आणि लोकशाही वाचवण्यासाठी आहे. एक्झिट पोलबद्दल घाबरण्याची गरज नाही, ते सर्व खोटे आहेत. भाजपला जास्त जागा दाखवण्याचे आदेश वरुन आले असतील. त्या बनावट एक्झिट पोलवर विश्वास ठेवू नका, विजय आपलाच होणार आहे. आपल्या प्रत्येकाला लढायचे आहे. ही निवडणूक कोणत्याही विशिष्ट व्यक्तीसाठी नाही, ही निवडणूक या देशाला वाचवण्यासाठी आहे. भगतसिंग म्हणाले होते की, जेव्हा सत्ता हुकूमशाही बनते, तेव्हा जेल ही जबाबदारी असते. तुरुंगात ते माझ्यासोबत काय करतील माहीत नाही. भगतसिंग यांना फाशी झाली, ते मलादेखील फाशी द्यायला कमी करणार नाहीत."

"मला माहित नाही की, मी तुरुंगातून परत कधी येईन. पण माझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब देशासाठी आहे. ईव्हीएमवर लक्ष ठेवा, उमेदवार हरला तरी तुम्ही तिथेच रहा. व्हीव्हीपीएटी स्लिप मशीनशी जुळली नाही, तर निवडणूक रद्द होते. आपण सतर्क राहिले पाहिजे. दाखवण्यात आलेले एक्झिट पोल खोटे आहेत. आम्ही 100 कोटींची लाच घेतली असेल, तर ते पैसे गेले कुठे? त्यांना आमच्याकडून एक रुपयाही मिळाला नाही. देशाच्या इतिहासात सर्वाधिक बहुमताने आलेल्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांना कोणत्याही पुराव्याशिवाय तुरुंगात टाकण्यात आले," असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.

ते पुढे म्हणतात, "त्याच्या मित्रांनी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले आहेत, एक्झिट पोलनंतर बाजार वर जाईल आणि ते पैसे कमावू शकतील, त्यामुळे खोटे एक्झिट पोल दाखवले जात आहेत. हे लोक अधिकाऱ्यांवर दबाव आणून त्यांची हेराफेरी करू शकतात. म्हणूनच मी इंडिया आघाडीच्या सर्व पक्षांना सांगू इच्छितो की, अंतिम मतमोजणी होईपर्यंत तिथेच रहा, जेणेकरून ते फेरफार करू शकणार नाहीत.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४AAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपा