शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

Arvind Kerjiwal : "केंद्र सरकार 8 वर्षांपासून खोट्या प्रकरणात अडकवण्याचा कट रचतंय"; केजरीवालांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 1:28 PM

Arvind Kerjiwal : अरविंद केजरीवाल यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, केंद्र सरकार गेल्या 8 वर्षांपासून त्यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचा कट रचत आहे. त्यासाठी अनेकांवर दबाव टाकण्यात आला. माझ्याविरुद्ध खोटी साक्ष देण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकण्यात आला. जे मान्य करत नव्हते त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले. त्याच्यावर विविध प्रकारचे अत्याचार करण्यात आले. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही याबाबत ट्विट केले आहे.

सीएम अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केलं की, ही 2015 ची घटना आहे. मोदी सरकार 2015 पासून मला खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. लोकांवर विविध प्रकारचा दबाव टाकून त्यांना माझ्याविरोधात वक्तव्ये करण्यास सांगितले जाते. अनेकांवर अत्याचारही झाले. देशासाठी काम करण्याऐवजी पंतप्रधान 24 तास विरोधकांना खोट्या खटल्यात अडकवण्यासाठी कट रचत असतात.

आम आदमी पार्टीचे अनेक नेते तुरुंगात आहेत. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हेही तुरुंगात आहेत. याशिवाय नुकतेच आपचे खासदार संजय सिंह यांनाही अटक करण्यात आली होती. आपल्या नेत्यांना खोट्या प्रकरणात अडकवण्यात आल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. 

2013 मध्ये दिल्लीत पहिल्यांदा आम आदमी पार्टीचं सरकार स्थापन झालं होतं. दोन वर्षांनंतर दिल्लीत पुन्हा निवडणुका झाल्या, तेव्हा आम आदमी पक्षाला प्रचंड बहुमत मिळालं. 2020 मध्ये तिसऱ्यांदा 'आप'ला मोठा विजय मिळाला. पंजाबमध्येही आपचं सरकार स्थापन झालं आहे. 2013 मध्ये स्थापन झाल्यानंतर 10 वर्षातच आम आदमी पार्टी राष्ट्रीय पक्ष बनला आहे. त्यांच्या पक्षाच्या झपाट्याने वाढ होत असल्याने भाजपा घाबरला असल्याचा आरोप 'आप'ने केला आहे.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदीAAPआप