शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
2
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
3
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
5
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
6
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
7
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
8
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
9
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
10
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार
11
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
12
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
13
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
14
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
15
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
16
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
17
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
18
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
19
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला

अशोक गेहलोतच राहणार राजस्थानचे मुख्यमंत्री; तूर्तास राज्यात निरीक्षक जाणार नाहीत 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2022 10:34 AM

राजस्थानात सध्या तरी मुख्यमंत्री बदलले जाणार नाहीत. काँग्रेस नेतृत्वाने मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना तसे संकेत दिले आहेत.

आदेश रावल, लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली:राजस्थानात सध्या तरी मुख्यमंत्री बदलले जाणार नाहीत. काँग्रेस नेतृत्वाने मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना तसे संकेत दिले आहेत. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी हा निर्णय घेतला आहे की, सध्या कोणीही निरीक्षक आमदारांचे मत घेण्यासाठी जयपूरला पाठविण्यात येणार नाहीत. 

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सोनिया गांधी यांची भेट घेऊन ज्या दिवशी माफी मागितली होती त्यानंतर काही तासांतच संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी असे विधान केले होते की, राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय सोनिया गांधी दोन दिवसांत घेतील. आता सोनिया गांधी यांनीच राजस्थानचे सरचिटणीस प्रभारी अजय माकन यांना निर्देश दिले आहेत की, राज्यातील पूर्ण प्रकरण शांत करण्यात यावे. आमदारांमध्ये हा संदेश द्यायचा आहे की, कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही. यामागचे कारण असे आहे की, काँग्रेस नेतृत्वाला याबाबत असा अहवाल मिळाला आहे की, जर अशोक गेहलोत यांना हटविण्याचा प्रयत्न झाला तर तेथील सरकार पडू शकते. 

पंजाबमधील पराभवासाठी काँग्रेस नेतृत्वाला जबाबदार ठरविण्यात येत होते. यावेळी राजस्थानातील सरकार पडण्याचा आरोप सोनिया गांधी या स्वत:वर येऊ देऊ इच्छित नाहीत.  

टॅग्स :Rajasthanराजस्थानAshok Gahlotअशोक गहलोतcongressकाँग्रेस