शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

NRC ची अंमलबजावणी, ३० लाख कुटुंबांना आर्थिक मदत; आसामसाठी भाजपचे संकल्पपत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 12:31 IST

Assam Assembly Election 2021: विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने संकल्पपत्र जाहीर केले आहे.

ठळक मुद्देआसाम विधानसभा निवडणुकांसाठी भाजपचे संकल्पपत्र जाहीरNRC ची योग्य पद्धतीने अंमलबजावणी, विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचे आश्वासनस्वामी विवेकानंद यांच्या नावाने नवीन योजना आखून स्टार्टअपसाठी प्रोत्साहन देणार

गुवाहाटी : आसाम विधानसभा निवडणुकीच्या (Assam Assembly Election 2021) पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला असून, भाजपचे मंत्री, नेते विविध ठिकाणी जनतेला संबोधित करत आहेत. आसाममधील सत्ता कायम राखण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने संकल्पपत्र जाहीर केले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी यांनी निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. आसाममध्ये योग्य पद्धतीने नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप (NRC) ची अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन भाजपकडून देण्यात आले आहे. (assam assembly election 2021 bjp leader jp nadda release manifesto free education caa nrc brahmaputra)

जेपी नड्डा यांनी आसाम विधानसभा निवडणुकीसाठी संकल्पपत्र जाहीर करताना पुन्हा एकदा NRC च्या अंमलबजावणीचे आश्वासन दिले आहे. यासह विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, CAA, ३० लाख कुटुंबीयांना आर्थिक मदत अशा मोठ्या आश्वासनांचा यात समावेश आहे. 

मिशन ब्रह्मपुत्र, मोफत शिक्षण

आसाममध्ये भाजप सरकार सत्तेत आल्यास सरकारी शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाईल. तसेच आठवीनंतर विद्यार्थ्यांना सायकल दिली जाईल. मिशन ब्रह्मपुत्र अंतर्गत महापूर रोखण्यासाठी विशेष योजना आखली जाईल, जेणेकरून आसामवासीयांना महापुराची समस्या भेडसावणार नाही, असे आश्वासन भाजपकडून देण्यात आले आहे. 

महिलांना नोकरीत ३३ टक्के आरक्षण, CAA लागू होणार; प. बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र जाहीर

३० लाख कुटुंबांना आर्थिक मदत

स्वामी विवेकानंद यांच्या नावाने नवीन योजना आखून स्टार्टअपसाठी प्रोत्साहन दिले जाईल. अरुणोदय योजनेंतर्गत ३० लाख कुटुंबांना प्रत्येक महिन्याला ३ हजार रुपये देण्यात येतील. तसेच अडीच लाखांचीही मदत करण्यात येणार आहे. अवैध बांधकामे हटवण्यात येतील. आसाममधील परिसीमन प्रक्रियेची व्याप्ती वाढवली जाईल. सर्वांना जमिनीचा मालकी हक्क दिला जाईल, असे आश्वासन भाजपकडून देण्यात आले आहे. 

NRC आणि आत्मनिर्भर आसाम

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांप्रमाणे योग्य पद्धतीने NRC ची अंमलबजावणी आसाममध्ये केली जाईल. घुसखोरांची ओळख पटवली जाईल. आत्मनिर्भर आसाम अभियान राबवले जाईल. प्रत्येक क्षेत्राला मदत आणि प्रोत्साहन दिले जाईल. सरकारी क्षेत्रात २ लाख रोजगार आणि ३० मार्च २०२२ पर्यंत एक लाख नोकऱ्या दिल्या जातील. तसेच खासगी क्षेत्रात ८ लाख रोजगार उपलब्ध करून दिले जातील, असे आश्वासन भाजपने आपल्या संकल्पपत्रातून दिले आहे. 

भाजपने जाहीर केलेले संकल्पपत्र बंगालविरोधी; टीएमसीची टीका

दरम्यान, सर्वानंद सोनोवाल आणि हेमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखाली गेली ५ वर्षे भाजपचे सरकार आसाममध्ये आहे. भाजपकडून सत्ता टिकवण्यासाठी जोरदार प्रयत्न केला जात आहे. काँग्रेसकडूनही जोरात प्रचार केला जात आहे. आसाम विधानसभेच्या १२६ जागा आहेत. पहिल्या टप्प्यात ४७ जागांसाठी ७२ मार्चला, तर दुसऱ्या टप्प्यात ३९ जागांसाठी १ एप्रिलला आणि तिसर्‍या आणि शेवटच्या टप्प्यात ४० जागांसाठी ६ एप्रिलला मतदान होणार आहे. २ मे रोजी मतमोजणी होणार आहे. 

टॅग्स :Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१J P Naddaजगत प्रकाश नड्डाBJPभाजपाPoliticsराजकारणNational Register of Citizensएनआरसीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकAssembly Election Results 2021विधानसभा निवडणूक निकाल 2021