शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

काँग्रेस सर्वांत भ्रष्ट पक्ष; योजनांचे लाभ घेण्यासाठी भाजपला मत द्या: स्मृति इराणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 17:15 IST

केंद्रीय मंत्री स्मृति इराणी (smriti irani) यांनीही आसाममधील एका सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीका करत भाजपला मत देण्याचा आवाहन केले.

ठळक मुद्देस्मृति इराणी यांचा काँग्रेसवर हल्लाबोलयोजनांचे लाभ घेण्यासाठी भाजपला मत देण्याचे आवाहनकाँग्रेसने गरिबांसाठी कधीही काम केले नसल्याचा केला आरोप

मारियानी : केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा (Assembly Election 2021) कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आता राजकीय रणधुमाळी वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. पाचही राज्यांमध्ये अधिकाधिक यश मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने (BJP) कंबर कसली आहे. आसाम विधानसभा निवडणुकीसाठीही प्रचाराला वेग आला असून, भाजपचे अनेक नेते आता आसाममध्ये जाऊ लागले आहेत. केंद्रीय मंत्री स्मृति इराणी (smriti irani) यांनीही आसाममधील एका सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीका करत भाजपला मत देण्याचा आवाहन केले. (assam assembly election 2021 bjp leader smriti irani blamed that congress is most corrupt party)

आसाममधील एका सभेला संबोधित करताना केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृति इराणी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस सर्वांत भ्रष्ट पक्ष आहे. केंद्रातील आणि राज्यातील कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल, तर भारतीय जनता पक्षालाच मत द्या, असे आवाहन स्मृति इराणी यांनी यावेळी बोलताना केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी अशा अनेक योजना तयार केल्या आहेत, ज्याचा राज्यातील जनतेला पूरेपूर लाभ घेता येईल, असेही त्या म्हणाल्या.

जीवन क्षणभंगुर आहे; कोरोना लसीबाबत सद्गुरुंनी दिला 'हा' मोलाचा सल्ला

काँग्रेसने गरिबांसाठी कधीही काम केले नाही

केवळ भाजप असा पक्ष आहे, जो गरिबांच्या कल्याणासाठी कायम झटत असतो, काम करत असतो. काँग्रेसने कधीही गरिबांसाठी काम केले नाही. तो सर्वांत भ्रष्ट पक्ष आहे, अशी टीका स्मृति इराणी यांनी केली आहे. आसाममधील विधानसभा निवडणुकीत भाजपाला मतदान करा, असे त्यांनी सांगितले. आसाममध्ये अनेक बडे काँग्रेस नेते होऊन गेले. त्यातील पंतप्रधानही झाले. मात्र, राज्याचा विकास, गरिबांचे कल्याण झाले नाही. केवळ पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात आसाममध्ये एम्स उभे राहिले, असे इराणी यांनी नमूद केले. 

काँग्रेसने अजमलसोबत हातमिळवणी केली

काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने बदरुद्दीन अजमल यांच्या पक्षाशी युती करण्यापासून पक्षाला रोखले होते. मात्र, त्या ज्येष्ठ नेत्याचे निधन झाल्यावर लगेचच काँग्रेसने अजमल यांच्या पक्षाशी युती केली, असा आरोप इराणी यांनी केल्या. आसाम विधानसभेसाठी भाजपकडून उमेदवारी दिलेल्या रमानी तंती यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या रॅलीत स्मृति इराणी बोलत होत्या. 

टॅग्स :Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१Smriti Iraniस्मृती इराणीBJPभाजपाPoliticsराजकारण