शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

"आम्ही यापुढेही धाडसी पावले उचलणार", बालविवाहाविरोधात हिमंता सरकारची मोठी कारवाई!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 20:33 IST

बालविवाहाविरोधात सुरू केलेल्या मोहिमेचा एक भाग म्हणून आसाम पोलिसांनी काल रात्री ४१६ जणांना अटक केली असून ३३५ गुन्हे दाखल केले आहेत.

गुवाहाटी : आसामचे हिमंता बिस्वा सरमा सरकार बालविवाहाच्या विरोधात कठोर कारवाई करत आहे. बालविवाहाविरोधात सुरू केलेल्या मोहिमेचा एक भाग म्हणून आसाम पोलिसांनी काल रात्री ४१६ जणांना अटक केली असून ३३५ गुन्हे दाखल केले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

बालविवाहाबाबत मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची पोस्टही समोर आली आहे. त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले की, आसामने बालविवाहाविरुद्धचा लढा सुरूच ठेवला आहे. काल रात्री सुरू करण्यात आलेल्या कारवाईच्या तिसऱ्या टप्प्यात ४१६ अटक करण्यात आली असून ३३५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. ही सामाजिक कुप्रथा संपवण्यासाठी आम्ही यापुढेही धाडसी पावले उचलणार आहोत.

याचबरोबर, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, आसाममधील लोकांची ओळख जपण्यासाठी आणि त्यांचा विकास सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकार अथक प्रयत्न करत आहे. तसेच, घुसखोरांचा प्रभाव मर्यादित करण्यासाठी सरकार सीमांकनासाठी काम करत आहे. याशिवाय, राज्य सरकारने दहा हजार हेक्टर जमीन अतिक्रमणातून मुक्त केली आहे, असे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले.

सरकार आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण करत राहीलयाआधी १० डिसेंबर रोजी सोनितपूर जिल्ह्यातील जमुरीहाट येथे भारतीय जनता युवा मोर्चाने आयोजित केलेल्या स्वाहिद दिवस सोहळ्यात मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा सहभागी झाले होते. त्यावेळी आसाम सरकार आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे, असे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले. तसेच, आसाम चळवळीत जात, माती आणि वारसा यांच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी ज्यांनी बलिदान दिले, त्यांना मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी श्रद्धांजली वाहिली होती.

टॅग्स :AssamआसामCrime Newsगुन्हेगारी