शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

कोरोना पळून गेलाय, मास्क घालण्याची गरज नाही; भाजप मंत्र्याचा अजब दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2021 14:10 IST

गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचा उद्रेक झालेला पाहायला मिळत आहे. नव्या वर्षातील सर्वांत मोठ्या कोरोना रुग्णवाढीचा उच्चांक नोंदवला गेला आहे.

ठळक मुद्देभाजप मंत्र्यांचा अजब दावाकोरोना पळून गेलाय, मास्क घालण्याची गरज नाही - सरमागरज असेल, तेव्हा मास्क घालायला सांगू - सरमा

गुवाहाटी: गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचा उद्रेक झालेला पाहायला मिळत आहे. नव्या वर्षातील सर्वांत मोठ्या कोरोना रुग्णवाढीचा उच्चांक नोंदवला गेला आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. मात्र, आसाममधील आरोग्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी कोरोनाच्या संदर्भात अजब विधान केले आहे. (himanta biswa sarma react on corona)

हेमंत बिस्वा सरमा यांना निवडणूक आयोगाने २४ तास प्रचार करण्यापासून रोखले आहे. मात्र, पत्रकारांशी संवाद साधताना सरमा यांनी अजब तर्कट मांडले आहे. कोरोना पळून गेला आहे. आसाममध्ये तरी मास्क घालण्याची काहीही गरज नाही, असा अजब दावा सरमा यांनी यावेळी बोलताना केला आहे. 

चिंतेत भर! दिवसभरात तब्बल ९३ हजार नवे रुग्ण; देशातील कोरोनाबाधितांचा उच्चांक

गरज असेल, तेव्हा मास्क घालायला सांगू

आसाममधील नागरिकांना मास्क घालण्याची गरज नाही. मास्क घातल्यामुळे जनतेमधील भीती वाढली आहे. मास्क घालण्याची गरज असेल, तेव्हा शासनाकडून सांगण्यात येईल. मास्क घालून लोकं फिरायला लागले, तर ब्युटी पार्लर कसे चालणार, असा सवालही त्यांनी यावेळी केला. तसेच अर्थव्यवस्थेत सुधारणा होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. 

आचारसंहितेचे उल्लंघन

हेमंत बिस्वा सरमा यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची तक्रार काँग्रेसकडून करण्यात आली होती. निवडणूक आयोगाने याची दखल घेत ४८ तासांपर्यंत निवडणूक प्रचार करता येणार नाही, असे निर्देश आयोगाने दिले. मात्र, याविरोधात सरमा यांनी उच्च न्यायालयात दाद मागितल्यावर आयोगाने प्रचार न करण्याचे निर्बंध २४ तासांवर आणले. तसेच आचारसंहितेचे पालन करण्याची हमी सरमा यांच्याकडून घेतली. 

लॉकडाऊन करू नका; १० मागण्यांच्या निवेदनासह सदाभाऊ खोतांनी घेतली राज्यपालांची भेट

दरम्यान, देशभरात गेल्या २४ तासांत ९३ हजार २४९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले असून, ६० हजार ०४८ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, गेल्या २४ तासांत ५१३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात ६ लाख ९१ हजार ५९७ रुग्ण उपचार घेत असून, आतापर्यंत देशात ०१ कोटी २४ लाख, ८५ हजार ५०९ कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून, यापैकी एकूण ०१ कोटी १६ लाख २९ हजार २८९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच ७ कोटी ५९ लाख ७९ हजार ६५१ जणांना कोरोना लस देण्यात आली आहे. 

टॅग्स :Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१corona virusकोरोना वायरस बातम्याElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग