शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

आसामची NRC यादी वेबसाइटवरून गायब?, गृह मंत्रालयाकडून स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 14:12 IST

आसाममध्ये गेल्यावर्षी एनआरसीची प्रक्रिया झाली होती.

नवी दिल्ली : सीएए आणि एनआरसी या मुद्द्यांवरून सध्या देशातील राजकीय वातावरण तापले आहे. सीएए आणि एनआरसीच्या विरोधात ठिकठिकाणी विरोधी पक्षांकडून आंदोलने करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपाकडून सीएए आणि एनआरसीच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात येत आहे. यातच आता आसाम एनआरसीच्या डेटा संदर्भात वाद सुरू झाला आहे.

आसाममध्ये गेल्यावर्षी एनआरसीची प्रक्रिया झाली होती. त्याचा सर्व डेटा अधिकृत वेबसाइटवरून गायब झाला आहे. यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, यावर आता गृह मंत्रालयाने उत्तर दिले आहे. एनआरसी संबंधित डेटा पूर्णपणे सुरक्षित आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे डेटा वेबसाईटवर दिसत नाही, असे गृहमंत्रालयाने म्हटले आहे. 

गेल्या काही दिवसांपूर्वी आसाम एनआरसीचा डेटा गृह मंत्रालयाद्वारे http://www.nrcassam.nic.in या वेबसाइटवर अपलोड करण्यात आला होता. यामध्ये संपूर्ण यादी होती. मात्र, अचानक हा डेटा हटविण्यात आला आणि वेबसाइट सुद्धा सुरू होत नव्हती. यानंतर, अनेक अफवा पसरू लागल्या आणि यासंदर्भात गृह मंत्रालयाकडे प्रश्न उपस्थित होऊ लागले. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व अफवा दूर करत एनआरसीचा सर्व डेटा सुरक्षित असल्याचे सांगितले. तसेच, वेबसाईटवर क्लाउडच्या कारणास्तव डेडा दिसू शकत नाही. हा बिघाड लवकरच दुरुस्त करण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे.

एनआरसीचे राज्य कॉर्डिनेटर (समन्वयक) हितेश देव शर्मा यांनी यासंदर्भातील वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, "सध्या डेटा ऑफ लाइन करण्यात आला आहे. मात्र, ही चूक तांत्रिक कारणामुळे झाली आहे. वेबसाईटच्या क्लाउड सर्व्हिसची जबाबदारी आयटी फर्म विप्रोकडे देण्यात आली होती. पण, ती ऑक्टोबर 2019 पर्यंत उपलब्ध होती. 

याचबरोबर, हितेश देव शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील कॉर्डिनेटरने यंत्रणा अपडेट केली नव्हती. त्यामुळे 15 डिसेंबर रोजी विप्रो कंपनीने ही सुविधा बंद केली. दरम्यान, राज्य समन्वय समितीने आता यावर काम करण्यास सुरुवात केली असून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात विप्रो कंपनीला यासंदर्भात अधिकृत सूचना देण्यात आली आहेत. पुढील दोन ते तीन दिवसांत वेबसाईटवर हा सर्व डेटा दिसून येईल. 

दरम्यान, आसाममध्ये गेल्या वर्षी एनआरसीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. ज्यामध्ये 19 लाख लोक यादीतून बाहेर झाले होते. 31 ऑगस्ट 2019 रोजी सरकारकडून एनआरसीची अंतिम यादी जाहीर करण्यात आली होती. ज्यामध्ये आसाममधील एकूण 3,30,27,661 लोकांपैकी 3,11,21004 नागरिकांची नावे आली होती. तर 19,06,657 लोक एनआरसीच्या यादीतून बाहेर झाले होते. 

टॅग्स :Home Ministryगृह मंत्रालयNational Register of CitizensएनआरसीAssamआसाम