शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
2
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
3
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
4
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
5
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
6
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
7
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
8
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
9
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा
10
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
11
महायुतीमधील वाद विकोपाला गेले तर बसेल फटका; मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, ठाणे मतदारसंघात अंतर्गत धुसफूस
12
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
13
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
14
ऋता आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा; व्हायरल व्हिडीओवरून परांजपे यांची मागणी
15
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
16
ठाणे, वसईत २० लाखांत घर; म्हाडाच्या कोकण मंडळाचा ‘धमाका’
17
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
18
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
19
उद्योगपती मंदाना यांची १७० कोटींची मालमत्ता जप्त; बँक ऑफ बडोदाची फसवणूक केल्याचा ठपका
20
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली

आसाममध्ये एकापेक्षा अधिक विवाह करण्यावर येणार बंदी, मुख्यमंत्री म्हणाले, याच वर्षी लागू होणार कायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2023 8:24 PM

Marriage: आसाममध्ये बहुविवाह पद्धत संपुष्टात आणण्यासाठी कायदा तयार करण्याबाबत विधानसभेच्या अधिकारांची माहिती घेण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या एका तज्ज्ञांच्या समितीने रविवारी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना आपला अहवाल सुपूर्द केला आहे.

आसाममध्ये बहुविवाह पद्धत संपुष्टात आणण्यासाठी कायदा तयार करण्याबाबत विधानसभेच्या अधिकारांची माहिती घेण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या एका तज्ज्ञांच्या समितीने रविवारी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना आपला अहवाल सुपूर्द केला आहे. शर्मा यांनी समितीकडून त्यांना अहवाल सोपवण्याचे आणि कागदपत्रांचे फोटो शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. मात्र या अहवाताल काय आहे, तसेच त्यातून काय शिफारशी करण्यात आल्या आहेत, याबाबतची माहिती समोर आलेली नाही. 

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितलं की, तज्ज्ञांच्या समितीने आज आपला अहवाल राज्य सरकारकडे सपूर्द केला आहे. या आर्थिक वर्षाच्या आतच त्याबाबतचा कायदा लागू होणार आहे. आम्ही आमदारंना तो वाचण्यासाठी आणि त्याबाबत चर्चा करण्यासाठी वेळ देऊ इच्छितो. ,समितीने आपल्या अहवालामध्ये सांगितले की, राज्य सरकार हा कायदा बनवण्यासाठी सक्षम आहे. 

मुख्यमंत्र्यांनी याबरोबरच सांगितले की, आसाम, जाती, पंथ किंवा धर्म यांच्या पलिकडे जाऊन महिला सक्षमीकरणासाठी सकारात्मक वातावरण तयार करण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे.

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी १२ मे रोजी निवृत्त न्यायमूर्ती रुमी कुमारी फुकन यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याची घोषणा केली होती. फुकन यांच्याबरोबर समितीतील इतर सदस्यांमध्ये राज्याचे महाधिवक्ता देवजीत सैकिया, वरिष्ठ पोलीस अतिरिक्त महाधिवक्ता नलिन कोहली आणि वरिष्ठ अधिवक्ता नकीब उर जमां यांचा समावेश होता.

१८ जुलै रोजी आसाम सरकारने समितीचा कार्यकाळ एका महिन्याने वाढवून १२ ऑगस्ट केली होती. समितीलआ आपला प्राथमिक अहवाल सोपवण्यासाठई ६० दिवसांची वेळ देण्यात आली होती. या समितीकडे समान नागरी कायद्यासंदर्भात राज्याच्या मार्गदर्शक तत्त्वांशी संबंधित घटनेतील कलम २५ आणि मुस्लिम पर्सनल लॉ अधिनियम १९३७ मधील तरतुदींची पडताळणी करण्याचं काम सोपवण्यात आलं होतं.  

टॅग्स :marriageलग्नAssamआसाम