शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

CoronaVirus News : आणखी दोन आठवडे लॉकडाऊन वाढवा, 'या' राज्याची केंद्राकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 17:13 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता अनेक राज्यांनी लॉकडाऊन वाढविण्याची मागणी केली आहे.

ठळक मुद्देआसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनीही लॉकडाऊन वाढविण्याची मागणी केली आहे. शुक्रवारी सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितले की, राज्याने केंद्राला पत्र लिहिले असून यामध्ये लॉकडाऊन 18 मेपासून आणखी दोन आठवड्यांसाठी वाढविण्याची विनंती केली आहे.

गुवाहाटी - देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने १७ मेपर्यंत लॉकडाऊन लागू केला आहे. सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता अनेक राज्यांनी लॉकडाऊन वाढविण्याची मागणी केली आहे. यातच आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनीही लॉकडाऊन वाढविण्याची मागणी केली आहे. शुक्रवारी सर्वानंद सोनोवाल यांनी सांगितले की, राज्याने केंद्राला पत्र लिहिले असून यामध्ये लॉकडाऊन 18 मेपासून आणखी दोन आठवड्यांसाठी वाढविण्याची विनंती केली आहे.

मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांची शुक्रवारी गुवाहाटी येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी केंद्र सरकारने लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यासंदर्भात शुक्रवारपर्यंत सर्व राज्यांना आपल्या सूचना देण्यास सांगितले होते. त्यानुसार आसाम सरकारने आपली भूमिका केंद्राला कळविली आहे, असे सर्वानंद सोनोवाल यांनी सांगितले. 

केंद्र सरकारला पाठविण्यात आलेल्या सूचनांमध्ये लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात राज्यासाठी आवश्यक असलेल्या सवलतींबाबतही मत मांडले आहे, असे सर्वानंद सोनोवाल यांनी सांगितले. केंद्र सरकारला यावर विचार करण्यास वेळ दिला पाहिजे. मला आत्ता याबद्दल जास्त काही बोलायचे नाही. सर्व राज्यांनी केंद्राला पत्र लिहिले असून ते लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्याबाबत निर्णय घेतील, असेही सर्वानंद सोनोवाल यांनीही म्हटले आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार दिवसांपूर्वी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा केली. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा 17 तारखेला संपणार आहे.  लॉकडाऊन वाढविण्याबाबत सर्व राज्यांनी स्थानिक परिस्थितीचा विचार करून सर्व राज्यांना 15 तारखेपर्यंत आराखडा सादर करण्याच्या सूचना पंतप्रधानांनी दिल्या आहेत.

टॅग्स :AssamआसामSarbananda Sonowalसर्वानंद सोनोवालcorona virusकोरोना वायरस बातम्या