शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

निवडणुका संपल्या! आता 31 मार्चला संपणाऱ्या मोफत रेशन योजनेचे काय होणार? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 11:40 IST

PMGAY : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी झालेल्या मोदी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अतिरिक्त गहू आणि तांदूळ खरेदी आणि साठवणुकीच्या मुद्द्यावर चर्चा झाली. या बैठकीला भारतीय अन्न महामंडळाचे  (Food Corporation of India) अधिकारीही उपस्थित होते.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमधील विधानसभा निवडणुकींचे निकाल गुरूवारी (दि.10) जाहीर झाले. या निवडणुकांमध्ये पंजाब वगळता चारही राज्यात भाजपाने बाजी मारली आहे. तर पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला बहुमत मिळाले आहे. दरम्यान, लोककल्याणकारी योजनांच्या जोरावर उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये भाजप पुन्हा सत्तेत आल्याने केंद्रातील मोदी सरकार या महिन्यानंतरही गरिबांना मोफत धान्य पुरवठा सुरू ठेवणार का? असा सवाल सध्या उपस्थित होत आहे. कारण, पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा (PMGAY) सध्याचा टप्पा 31 मार्च रोजी संपत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी झालेल्या मोदी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अतिरिक्त गहू आणि तांदूळ खरेदी आणि साठवणुकीच्या मुद्द्यावर चर्चा झाली. या बैठकीला भारतीय अन्न महामंडळाचे  (Food Corporation of India) अधिकारीही उपस्थित होते. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, केंद्र सरकार या हंगामात नवीन खरेदीसाठी गोदामांमध्ये अधिक जागा मोकळी करण्याचा विचार करत आहे. त्यासाठी अतिरिक्त स्टॉकच्या निर्यातीसह विविध पर्यायांचा विचार केला जात आहे.

पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला सरकार शेतकऱ्यांकडून धान्य खरेदीला सुरुवात करणार आहे. FCI कडे जवळपास 520 लाख टन अन्नधान्याचा साठा आहे, ज्यामध्ये सुमारे 240 लाख टन गहू आणि उर्वरित 280 लाख टन तांदूळ आहे. त्यामुळे केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना सुरू ठेवण्याचा विचार केल्यास अन्नधान्याचा तुटवडा जाणवणार नाही.

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणुकीपूर्वी कोविड रिलीफ पॅकेजचा भाग म्हणून डिसेंबर 2021 ते फेब्रुवारी 2022 दरम्यान उत्तर प्रदेशातील गरिबांना 6,000 कोटी रुपयांच्या केंद्रीय अनुदानासह 21 लाख टन गहू आणि तांदूळ मोफत वाटण्यात आले. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत, केंद्र सरकार गरिबांना दरमहा प्रति व्यक्ती 5 किलो मोफत धान्य देते.

यूपीचे योगी सरकारही अतिरिक्त रेशन देतेही योजना राज्यांमध्ये दारिद्र्यरेषेखालील लोकांसाठी सरकारी रेशन दुकानांवर उपलब्ध अनुदानित आणि मोफत अन्नधान्य योजनेव्यतिरिक्त (Subsidized and Free Food Grains Scheme) आहे. उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने आपल्यावतीने डाळी, साखर, हरभरा आणि खाद्यतेलाचे वितरण समाविष्ट केले आहे. अशा प्रकारे, उत्तर प्रदेशमधील गरीब कुटुंबांना दरमहा प्रति युनिट 5 किलो गहू-तांदूळ, 1-1 किलो हरभरा आणि डाळी, 1 लिटर खाद्यतेल आणि स्वस्त साखर मिळते.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाElectionनिवडणूक