शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
2
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
3
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
4
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
5
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
6
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
7
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
8
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
9
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
10
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
11
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
12
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
13
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
14
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
15
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
16
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
17
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
18
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
19
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
20
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा

दररोज सकाळी 52 सेकंदांसाठी स्तब्ध होतं 'हे' शहर; कारण वाचून वाटेल अभिमान, तुम्हीही कराल सलाम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 11:45 AM

देशभक्तीने या शहरातील लोकांची सुरुवात होते. 23 जानेवारी 2021 रोजी या उपक्रमाची सुरुवात झाली आणि हळूहळू एक ट्रेंड सेट होऊ लागला. 

नवी दिल्ली - तेलंगणात एक असं शहर आहे जिथे लोक दररोज सकाळी 52 सेकंदांसाठी स्तब्ध होतात. यामागचं खरं कारण समजल्यावर तुम्हालाही अभिमान वाटेल. देशभक्तीने या शहरातील लोकांची सुरुवात होते. रोज सकाळी 8.30 वाजता नलगोंडातील बारा प्रमुख ठिकाणी राष्ट्रगीत वाजतं आणि तिथले सर्वच लोक त्याच्या सन्मानार्थ उभे राहतात. नलगोंडा येथील जन गण मन उत्सव समितीने हा उपक्रम हाती घेतला आहे. 23 जानेवारी 2021 रोजी या उपक्रमाची सुरुवात झाली आणि हळूहळू एक ट्रेंड सेट होऊ लागला. 

जन गण मन उत्सव समितीचे अध्यक्ष कर्णती विजय कुमार आणि त्यांच्या मित्रांची हा ट्रेंड सेट करण्यामागे कल्पना आहे. या समितीच्या म्हणण्यानुसार प्रत्येक शहरात जर अशाप्रकारे रोज राष्ट्रगीत म्हणण्यात आलं तर अशाने लोकांच्या मनातील राष्ट्रभक्तीच्या भावनेला प्रोत्साहन मिळेल. गेल्या वर्षीपासून बरोबर 8.30 वाजता ठीक 52 सेकंदांसाठी सर्व नागरिक राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभे राहतात. नलगोंडा येथे 12 प्रमुख ठिकाणी लाउडस्पीकरवर राष्ट्रगीत लावण्यात येतं.

2020 मध्ये हा उपक्रम सुरू करण्यात येणार होता. परंतु निवडणूक आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव या दोन कारणांमुळे हा उपक्रम पुढं ढकलण्यात आला. हळूहळू नलगोंडाच्या आजूबाजूच्या गावांमध्येही हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. येत्या महिन्याभरात तिप्परथ्थी (tipparthi) या नलगोंडाजवळील गावातही हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं समितीने सांगितलं. त्यानंतर शहराजवळील अजून काही गावांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. शहरातील लोकांना 8.30 वाजता राष्ट्रगीत वाजण्याची सवयच झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Telanganaतेलंगणा