शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! नागपूर जिल्ह्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; पती-पत्नीसह दोन मुलांनी घेतला गळफास
2
कधीकाळी जिगरी दोस्त होते इराण-इस्रायल; जानी दुश्मन कसे बनले? सद्दामच्या इराकवर केलेला हल्ला
3
१९७१ आम्ही विसरलो नाही, आधी माफी मागा; बांगलादेशने पाकिस्तानला करून दिली आठवण
4
ख्रिस गेलचा PM मोदींना 'नमस्कार'! भारतीयांना ती शैली भावली; 'युनिव्हर्सल बॉस'ची लक्षवेधी पोस्ट 
5
Sarva Pitru Amavasya 2024: 'या' ठिकाणी करता येते जिवंतपणी श्राद्ध; मात्र हा तोडगा कोणासाठी? वाचा!
6
"रोहित पवार, रोहित पाटील, टोपेंसह ५० उमेदवारांना पाडणार", लक्ष्मण हाकेंची यादी तयार!
7
अजित पवारांनी तटकरे, पटेलांसह घेतली अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यावर चर्चा?
8
Raj Thackeray : "कितीही बेताल वक्तव्य केली तरी..."; गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी वाचाळवीरांना फटकारलं
9
कमाल! WhatsApp ची मोठी घोषणा, Video कॉलचा आनंद द्विगुणित; बदलणार चॅटिंगचा एक्सपीरियन्स
10
T20 WC 2024 : भारताचा विजयरथ! न्यूझीलंड, आफ्रिकेविरुद्ध 'भारी' सराव; गुरुवारपासून स्पर्धेचा थरार
11
फक्त 6 तास अ्न मोसाद इराणचे 100000 हून अधिक सीक्रेट न्यूक्लिअर डॉक्यूमेन्ट घेऊन 'भूर्र'; माजी राष्ट्रपतींचा दावा
12
गोविंदा गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी व्यक्त केला संशय
13
मुलगी झाली हो..! खुशबू तावडे आणि संग्राम साळवी दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
14
गुरु-शनी गोचर: ८ राशींचा सुवर्णकाळ, धनलक्ष्मी भरभरुन देईल; नवदुर्गा कृपा करेल, दसरा शुभ होईल!
15
इराण-इस्रायल या दोन्ही दैशांपैकी भारताचा सर्वात जवळचा मित्र कोण?; जाणून घ्या
16
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय तरी काय? आता Babar Azam चा कर्णधारपदाचा राजीनामा!
17
गोविंदाला कधी मिळणार डिस्चार्ज? अभिनेत्याच्या तब्येतीविषयी पत्नी सुनिता आहुजा यांनी दिली माहिती
18
"शिवसेनेमुळे माझा पराभव झाला", समरजित सिंह घाटगेंचं मोठं विधान
19
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
20
Irani Cup 2024 : अजिंक्य रहाणेचे शतक थोडक्यात हुकले! पण सर्फराजने गड गाठलाच; ऋतुराजचा संघ अडचणीत

१८ वर्ष लागली, नववधूचा शाप खरा ठरला! विवाहाच्या नवव्या दिवशी अतिकने केला होता पतीचा मर्डर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 11:15 AM

Atiq Ahmed: नेमकं प्रकरण काय होतं? कधी घडली होती घटना? जाणून घ्या...

Atiq Ahmed: प्रयागराजमध्ये माफिया, राजकारणी अतिक अहमद याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. दोन आठवड्यांपूर्वी उमेश पाल हत्येप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांच्या कोठडीत असताना त्याची संरक्षण देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. अतिक आणि त्याचा भाऊ अशरफ यांनी गेल्या ४० वर्षांपासून असलेली दहशत संपुष्टात आल्याचे बोलले जात आहे. यातच आता एका नववधूने दिलेला शाप तब्बल १८ वर्षांनंतर खरा ठरल्याचे म्हटले जात आहे. या महिलेच्या पतीची विवाहाच्या नवव्या दिवशी अतीक अहमदने हत्या केली होती. 

अतिक आणि अशरफ यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. काहीच दिवसांपूर्वी अतिकचा मुलगा अदसचा एन्काऊंटरमध्ये खात्मा करण्यात आला होता. तीन दिवसातच अतिकचे कुटुंबच नेस्तनाबूत झाले. या निमित्ताने १८ वर्षांपूर्वीच्या घटनेचा वारंवार उल्लेख होत आहे. अतिकच्या परिवाराला एका महिलेने शाप दिला होता. माझ्या पतीला ज्याप्रमाणे घेरून गोळीबारात ठार करण्यात आले. तसाच मृत्यू एक दिवस तुझ्याही वाट्याला येईल, या शब्दांत संताप व्यक्त केला होता. अतिकच्या हत्येनंतर या महिलेचा शाप खरा ठरल्याचे म्हटले जात आहे.

राजू पाल यांच्या पत्नीने दिला होता शाप

ही घटना सन २००५ मधील असल्याचे सांगितले जात आहे. प्रयागराज पश्चिम विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक होती. अतिकने त्याचा भाऊ अशरफला निवडणुकीत उतरवले होते. अशरफसमोर बसपाचे राजू पाल निवडणुकीच्या रिंगणात होते. राजू पाल यांनी ही विधानसभेची पोटनिवडणूक जिंकली. त्यानंतर काहीच दिवसांत राजू पाल यांचा विवाह झाला. पराभूत झालेल्या अतिक अहमद आणि अशरफ यांना राजू पाल यांचा विजय सहन झाला नाही. त्यांनी राजू पालची हत्या करण्याचा प्लॅन आखला. २५ जानेवारी २००५ रोजी धूमनगंज या ठिकाणी राजू पालला गुंडांनी घेरले आणि तिथेच त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या भीषण हत्याकांडाने प्रयागराज हादरले. राजू पाल यांच्या पत्नी पूजा पाल यांच्या हातावरची मेहंदी गेली नव्हती. विवाहाच्या नवव्या दिवशीच तिच्या पतीची खुलेआम हत्या करण्यात आली. त्याच दिवशी पूजा पालने अतिक आणि त्याच्या कुटुंबाला शाप दिला होता. 

अतिक आणि त्याच्या गुंडांनाही एक दिवस असेच मरण येईल

अतिक आणि त्याच्या गुंडांनाही एक दिवस असेच मरण येईल, जसे माझ्या पतीला आले. एक ना एक दिवस देव त्यांच्या कर्माचे फळ त्यांना देईल, असा संताप पूजा पाल यांनी व्यक्त केला होता. १८ वर्षानंतर शनिवारी रात्री घडलेल्या घटनेनंतर राजू पाल हत्याकांडावर अधिक चर्चा होत असल्याचे सांगितले जात आहे. अतिक आणि अशरफ यांच्या मृत्यूनंतर पूजा पाल यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. जैसा करता है वैसाही भरता है. इतिहासाची पुनरावृत्ती होतच असते. माणसाच्या कर्माचे फळ इथेच भोगून जावे लागते, असे त्या म्हणाल्या. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश