शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

आतिशी यांनी मुख्यमंत्रीपदाचा दिला राजीनामा, उपराज्यपालांनी विधानसभा केली बरखास्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 12:54 IST

८ फेब्रुवारी रोजी झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत भाजपने बहुमताचा आकडा गाठला आहे.

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला. तर सत्ताधारी आपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. आपच्या पराभवानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. 

गेल्या वर्षी २१ सप्टेंबर रोजी आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या होत्या. त्या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री होत्या. आतिशी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर उपराज्यपाल व्ही.के.सक्सेना यांनी सातवी विधानसभाही बरखास्त केली आहे.

८ फेब्रुवारी रोजी झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत भाजपने बहुमताचा आकडा गाठला आहे. २७ वर्षांनंतर आता भाजप दिल्लीत सरकार स्थापन करणार आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आपला ७० पैकी २२ जागा मिळाल्या, तर भाजपला ४८ जागा मिळाल्या. विजयानंतर भाजपने सरकार स्थापनेची तयारी सुरू केली आहे. 

२०१५ आणि २०२० च्या विधानसभा निवडणुकीत आपने शानदार विजय मिळवला होता. मात्र, यावेळी आपला निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या जागा ७० पैकी २२ पर्यंत कमी झाल्या आहेत. तसेच, या निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेसला धक्का बसला असून खातेही उघडता आले नाही.

आतिशी दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री बनल्या होत्याआतिशी दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री बनल्या होत्या. याआधी सुषमा स्वराज आणि शीला दीक्षित यांनीही मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली होती. अरविंद केजरीवाल तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आतिशी यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले होते. आतिशी यांचा कार्यकाळ फक्त साडेचार महिन्यांचा राहिला

निवडणुकीत अनेक दिग्गजांचा पराभवया विधानसभा निवडणुकीत आपचे तीन मंत्री विजयी झाले आहेत. गोपाल राय, मुकेश अहलावत आणि इम्रान हुसेन यांनी आपापल्या जागांवर विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे, अनेक मोठ्या नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. ज्यामध्ये माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि माजी मंत्री सतेंद्र जैन यांच्यासारख्या नेत्यांचा समावेश आहे.

टॅग्स :delhiदिल्लीdelhi electionदिल्ली निवडणूकAtishiआतिशीAAPआपBJPभाजपा