शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 19:01 IST

Delhi CM Atishi : दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री आतिशी यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत.

Delhi CM Atishi : नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शनिवारी राजभवनात आयोजित कार्यक्रमात अतिशी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आतिशी यांच्यासह ५ मंत्र्यांनीही शपथ घेतली. अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाच्या राजीनामा दिल्यानंतर  विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत आतिशी यांची मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली होती. 

आतिशी या आम आदमी पक्षाच्या बड्या नेत्यांपैकी एक आहेत. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्याकडे दिल्लीची मोठी जबाबदारी दिली आहे. पण, दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री आतिशी यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत. आतिशी यांचा सरकार चालवण्याचा पुढील मार्ग सोपा नसणार आहे. कारण, आम आदमी पक्षावर आधीच अनेक गंभीर आरोप झाले आहेत. अशा परिस्थितीत आतिशी या दिल्लीचे सरकार कसे चालवतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

विरोधकांचा हल्लाबोल होणार अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत राजीनाम्याची घोषणा केल्यापासून भाजपसह संपूर्ण विरोधक सातत्याने आम आदमी पक्षावर हल्लाबोल करत आहेत. आम आदमी पक्षाच्या सरकारवर गलथान कारभाराचा आरोप भाजप करत आहे. अशा स्थितीत आतिशी यांनी सरकारच्या कामाला गती देण्याची गरज आहे. त्यांना कमी वेळेत जास्त काम करावे लागेल. तसेच, भाजपसोबतच काँग्रेस सुद्धा आम आदमी पक्षावर हल्लाबोल करत आहे. दरम्यान, जशा निवडणुका जवळ येतील, तसं विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील. अशा परिस्थितीत आतिशी यांना आपल्या कामाच्या जोरावर विरोधकांना उत्तर द्यावं लागणार आहे.

पक्षाची प्रतिमा सुधारणं, मोठं आव्हान असणारदिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे मद्य धोरण प्रकरणात जामिनावर आहेत. याशिवाय, अनेक महिने तुरुंगात राहिल्यानंतर पक्षाचे नेते मनीष सिसोदियाही बाहेर आले आहेत. अशा स्थितीत आम आदमी पक्षाची प्रतिमा सुधारणे, हे मुख्यमंत्री अतिशी यांच्यासाठी मोठं काम असणार आहे. सरकारी योजना प्रभावीपणे राबवण्यासोबतच आतिशी यांना जनतेत जाऊन पक्षाची बाजू मांडावी लागणार आहे.

आश्वासनांची पूर्तता करावी लागणारयाचबरोबर, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जनतेला अनेक महत्त्वाची आश्वासने दिली आहेत. २०२५ पर्यंत यमुना स्वच्छ करणे, मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेंतर्गत महिलांना १,००० रुपये मानधन देणे, सेवा घरापर्यंत पोहोचवण्याची योजना, दिल्ली इलेक्ट्रिक वाहन धोरण २.० आणि सौर धोरण लागू करणे, अशी अनेक आश्वासने अरविंद केजरीवाल यांनी दिली आहेत. त्यामुळे आता निवडणुकीपूर्वी आतिशी यांना या योजना आणि आश्वासनांची पूर्तता करावी लागणार आहे.

टॅग्स :AtishiआतिशीAAPआपdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालAam Admi partyआम आदमी पार्टी