शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

एटीएमवरही होऊ शकतो सायबर हल्ला

By admin | Published: May 15, 2017 12:29 AM

आंध्र प्रदेश पोलिसांच्या १०२ सिस्टीमला हॅकर्सने हॅक केल्यानंतर देशातील सायबर हल्ल्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : आंध्र प्रदेश पोलिसांच्या १०२ सिस्टीमला हॅकर्सने हॅक केल्यानंतर देशातील सायबर हल्ल्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. देशातील ७० टक्के एटीएम सायबर हल्ल्याची शिकार होऊ शकतात. कारण, या एटीएममध्ये आउटडेटेड झालेल्या विंडोज एक्सपीचा उपयोग करण्यात येतो. या सिस्टीमचे नियंत्रण त्या विक्रेत्यांकडे असते जे बँकेला ही सिस्टीम पुरवितात. मायक्रोसॉफ्टने विंडोज एक्सपीला सपोर्ट करणे बंद केलेले आहे. आंध्रातील सायबर अ‍ॅटॅकनंतर मायक्रोसॉफ्टने विंडोज एक्सपीसाठी अपडेट रीलीज केले आहेत. जर भारतातील एटीएमला सायबर हल्लेखोरांनी लक्ष्य केले तर परिस्थिती किती बिकट होऊ शकते याचा अंदाज कोणी लावू शकत नाही. पंतप्रधान कार्यालयातील राष्ट्रीय सायबर सुरक्षा सल्लागार गुलशन राय यांनी सांगितले की, अशा १०० सिस्टीमवर हल्ला झाला होता. पण, आता कोणताही धोका नाही. सायबर हल्लेखोर या डेटाला इनस्क्रिप्ट करून लॉक करतात. डेटाला डिक्रिप्ट करण्यासाठी ते रक्कम मागतात. चेन्नईच्या बाहेरच्या भागातील निस्सान - रेनॉल्ट या कंपनीचे उत्पादन सायबर हल्ल्यामुळे बंद करण्यात आले होते, असे सांगण्यात येत आहे. पण, कंपनीने यावर काही भाष्य केले नाही. सरकारी आकडेवारीनुसार, गत १२ ते १४ महिन्यांत भारतात ११ हजार नेटवर्कविरुद्ध हल्ले झाले आहेत. भारत त्या ९९ देशांपैकी एक आहे ज्या देशात अधिकाधिक सायबर हल्ले होतात.