शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

'मंदिरे अन् हिंदूंवर हल्ले...', बांग्लादेशबाबत एस जयशंकर यांनी संसदेला दिली महत्वाची माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2024 3:46 PM

Bangladesh Crisis : 'शेख हसीना यांना सत्तेवरून हटवणे हाच आंदोलकांचा एकमेव अजेंडा होता.'

Bangladesh Protest : भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बांग्लादेशातील बिघडलेल्या परिस्थितीबाबत राज्यसभेत निवेदन दिले आणि भारताची भूमिका स्पष्ट केली. राज्यसभेत बोलताना परराष्ट्र मंत्र्यांनी मंगळवारी (6 ऑगस्ट) सांगितले की, जानेवारी 2024 मध्ये झालेल्या निवडणुकांपासून बांग्लादेशात तणावाचे वातावरण आहे. बांग्लादेशात हजारो लोक रस्त्यावर उतरले असून, तेथील अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. भारत सरकार या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. 

शेख हसीना यांना सत्तेवरुन हटवणे...परराष्ट्र मंत्री पुढे सांगतात, शेख हसीना यांना सत्तेवरून हटवणे हाच आंदोलकांचा एकमेव अजेंडा होता. भारत सरकार लष्करप्रमुखांच्या संपर्कात आहे. आम्हाला आशा आहे की, आता बांग्लादेशातील प्रभारी सरकार भारतीय उच्चायुक्तालय आणि आमच्या लोकांना सुरक्षा प्रदान करेल. शेख हसीना यांनी काही काळ भारतात राहण्याची विनंती केली होती, त्यामुळे त्या सध्या भारतात राहतील, असेही जयशंकर यांनी सांगितले. 

4 ऑगस्टला परिस्थिती सर्वात जास्त बिघडलीबांग्लादेशात जानेवारीपासून तणाव आहे. आम्ही तेथील राजकीय पक्षांच्या संपर्कात होतो. हिंसाचारात बांग्लादेशातील सरकारी इमारती आणि पायाभूत सुविधांवर हल्ले झाले आहेत. जुलै महिन्यात महिनाभर हिंसाचार सुरू होता. अनेक ठिकाणी अल्पसंख्याकांच्या दुकानांवर आणि मंदिरांवर हल्ले होत आहेत, ही आमच्यासाठी चिंतेची बाब आहे, असेही जयशंकर यावेळी म्हणाले.

परराष्ट्र मंत्री सर्वपक्षीय बैठकीत काय म्हणाले?जयशंकर यांनी सर्वपक्षीय बैठकीत हिंसाचारग्रस्त देशातील परिस्थिती आणि या परिस्थितीच्या संभाव्य सुरक्षा, आर्थिक आणि राजनैतिक परिणामांना तोंड देण्यासाठी भारत सरकारने उचललेल्या पावलांची माहिती दिली. ते म्हणाले, बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी भारत सरकारकडून मदत मागिली होती, त्यानुसार त्यांची मदत केली जाईल. शेख हसीना मोठ्या धक्क्यात आहेत, त्यामुळे त्यांच्याशी बोलण्यापूर्वी सरकार त्यांना वेळ देत आहे. भारताने बांग्लादेशच्या लष्करप्रमुखांशी चर्चा केली असून, त्यांना 10,000 हून अधिक भारतीय विद्यार्थ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यास सांगितले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. 

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरBangladeshबांगलादेशParliamentसंसदBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार