शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
4
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
5
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
6
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
7
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
8
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
9
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
10
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
11
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
13
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
14
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
15
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
16
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
17
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
18
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
19
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
20
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ

रस्ते अपघात ५० टक्के कमी करण्याचे प्रयत्न

By admin | Published: January 12, 2016 2:06 AM

भारतात दरवर्षी सुमारे पाच लाख अपघात होतात. त्यात साधारणत: दीड लाख लोक मृत्युमुखी पडतात आणि तीन लाख लोक कायमचे अपंग होतात. अपघातात जीव गमावणाऱ्यांमध्ये

- सुरेश भटेवरा,  नवी दिल्लीभारतात दरवर्षी सुमारे पाच लाख अपघात होतात. त्यात साधारणत: दीड लाख लोक मृत्युमुखी पडतात आणि तीन लाख लोक कायमचे अपंग होतात. अपघातात जीव गमावणाऱ्यांमध्ये २५ ते ३० वयोगटातील तरुणांची संख्या मोठी आहे. देशाचे ५५ ते ६० कोटींचे नुकसान होते. ही रक्कम देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ३ टक्के आहे. हे महाभयंकर नुकसान टळावे व अपघाताचे प्रमाण किमान ५० टक्क्यांनी घटावे, यासाठी केंद्रीय परिवहन मंत्रालयाने विविध उपाययोजनांना वेगाने प्रारंभ केला आहे, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकारांना दिली. देशभर रस्ता सुरक्षा सप्ताह सोमवारपासून सुरू झाला. दिल्लीत इंडिया गेटवर त्याचे झेंडा दाखवून औपचारिक उद्घाटन गृहमंत्री राजनाथसिंह यांनी केले. यावेळी गडकरींनी संवाद साधला.भारतात वाढत्या अपघातांची तीन प्रमुख कारणे आहेत. रस्त्यांची नागमोडी वळणे, अप्रशिक्षित चालकांना सर्रास वाहनचालक परवाना देणे तसेच वाहनचालक व वाहनांना परवाना देण्याच्या पध्दतीतील ठळक त्रुटी. प्रचलित व्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्यासाठी संगणकाद्वारे नियंत्रित कठोर परीक्षेत उत्तीर्ण झाल्याशिवाय यापुढे वाहनचालक परवाना कोणालाही मिळणार नाही, असे नमूद करीत गडकरी म्हणाले, संगणकाद्वारे नियंत्रित ड्रायव्हिंगची अत्याधुनिक परीक्षा घेण्याची केंद्रे प.बंगाल, राजस्थान तसेच महाराष्ट्रात पुणे येथे ५ ते ६ एकर जागेत सुरू झाली आहेत. लवकरच अशी केंद्रे देशभर स्थापन केली जातील.