शहरं
Join us  
Trending Stories
1
"असा प्रत्येक कट महाराष्ट्रातील लोक उधळून लावतील", मोदींचा काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा
2
देशातील गरिबांना 2028 पर्यंत मोफत धान्य मिळणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
मनोज जरांगेंशी पंगा घेणाऱ्या अपक्ष आमदाराने भाजपाकडून निवडणूक लढण्याची केली घोषणा
4
"जितना हिंदू बंटेगा, उतना...", असं का बोलले पंतप्रधान मोदी? महाराष्ट्रातील जनतेला केलं मोठं आवाहन
5
'असरदार' सरदार! अर्शदीपची Top 10मध्ये एन्ट्री; हार्दिक पांड्याही दुसऱ्या यादीत Top 3 मध्ये!
6
 "महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार", 90 कोटींच्या कंत्राटावर जयंत पाटलांची संतप्त पोस्ट
7
हरयाणात 14 जागांवर काँग्रेसचा निसटचा पराभव; आम आदमी पक्षामुळे गमावल्या 5 जागा
8
हरयाणात निकालांनंतर भाजपाचं अर्धशतक पूर्ण, दोन अपक्ष आमदारांनी दिला पाठिंबा
9
Trent shares: TATA च्या 'या' शेअरनं रचला इतिहास, २ दिवसांपासून मोठी खरेदी; एक्सपर्ट बुलिश
10
फायद्याची बातमी! २०० रुपये वाचवून गुंतवणूक करा, मॅच्युरिटीवर २८ लाख मिळतील; LIC ची जबरदस्त योजना
11
गुणरत्न सदावर्तेंनी 'बिग बॉस'चे नियम बसवले धाब्यावर, आधी ढाराढूर झोपले आता घातला गोंधळ!
12
कर्मचाऱ्यांसाठी ESIC बाबत महत्त्वाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय, अनेकांना मिळणार लाभ!
13
वाढदिवस ठरला शेवटचा! केक, पापड आणि...; ५ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूमागचं सत्य काय?
14
"बाप-बेटे हल्ली दारोदारी फिरतात, दारावर टक-टक करुन..."; आशिष शेलारांचे ठाकरे पिता-पुत्रांवर टीका
15
हरयाणा निकालामुळे भाजपाचं कमबॅक, मविआत संघर्ष; ठाकरेंचेही सूर बदलले, पडद्यामागचं राजकारण?
16
माधुरी की विद्या? नक्की कोण आहे मंजुलिका? कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैय्या ३' चा ट्रेलर रिलीज
17
जम्मू-काश्मिरमध्ये इंडिया आघाडीचे अवघे दोन हिंदू उमेदवार जिंकले, कोण आहेत ते? एकाने नोंदवला धक्कादायक निकाल  
18
Suzlon Energy बाबत मोठी अपडेट, एक वृत्त आणि शेअरनं पकडला रॉकेट स्पीड
19
हरयाणातील गोहानाच्या जिलेबीची 'तारीफ' राहुल गांधींना महागात पडली! काय म्हणाला दुकानदार?
20
वकिलांकडून भाजपच्या आमदाराला पोलिसांसमोरच मारहाण; अर्बन बँक निवडणुकीतला प्रकार

लक्ष २०२४! भारत जोडो यात्रेनंतर आता काँग्रेस खा. राहुल गांधींचा काय आहे नवा प्लॅन?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 3:59 PM

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा संपायच्या आधीच काँग्रेसनं दुसरं अभियान सुरू केले आहे.

नवी दिल्ली - काँग्रेसची भारत जोडो यात्रा सोमवारी श्रीनगरमध्ये संपली. २०१४ ला काँग्रेस देशातील सत्तेतून बाहेर गेली. निसटता जनाधार आणि कमकुवत होत असलेल्या पक्षसंघटनेला पुन्हा नवजीवन देण्यासाठी राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत ४ हजार किमीहून जास्त पदयात्रा काढली. यावेळी राहुल गांधींनी बेरोजगारी, आर्थिक आणि सामाजिक असंतुलनसारखे मुद्दे पुढे आणले. भारत जोडो यात्रा संपल्यानंतर आता राहुल गांधींचा पुढचा प्लॅन काय असा प्रश्न उभा राहिला.

५ महिने चाललेल्या भारत जोडो यात्रेत ही अराजकीय होती असं म्हटलं जात होते. परंतु कुठल्याही पक्षाच्या नेत्याने काढलेली यात्रा नेहमी राजकारणाशी जोडलेली असते. त्यामुळे राहुल गांधींच्या या यात्रेचा काँग्रेसच्या राजकारणाशी संबंध आहेच. राहुल गांधींच्या यात्रेमुळे काँग्रेसमध्ये उत्साह आणि कार्यकर्त्यांचे मनोबल वाढलं आहे. आता राहुल गांधींच्या नेतृत्वात पदयात्रेचा दुसरा टप्पा जाहीर करण्यात आला आहे. २०२४ पर्यंत काँग्रेसनं स्वत:ला सक्रीय ठेवण्यासाठी ग्राऊंडवर उतरून वातावरण निर्मिती करण्याचा खास प्लॅन बनवला आहे. 

काँग्रेसचं हाथ से हाथ जोडो अभियानराहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा संपायच्या आधीच काँग्रेसनं दुसरं अभियान सुरू केले आहे. देशाच्या वेगवेगळ्या राज्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त काँग्रेसनं हाथ से हाथ जोडो अभियान सुरू केले आहे. हे अभियान ३ महिने चालेल. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतील अनुभव असलेले पत्र घेऊन काँग्रेस नेते-कार्यकर्ते गावोगावी, घरोघरी जात लोकांना भेटतील. त्याअंतर्गत जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय संमेलन आणि रॅली आयोजित करण्यात येणार आहे. 

राहुल गांधी पुन्हा पदयात्रा काढणारहाथ से हाथ जोडो अभियानानंतर काँग्रेस भारत जोडो यात्रा अभियानाचा दुसरा टप्पा सुरू करण्याचा प्लॅन करत आहे. काँग्रेस महासचिव के. सी वेणुगोपाळ यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधींच्या नेतृत्वात पदयात्रेचा दुसरा टप्पा सुरू होईल. या पदयात्रेचा फायनल रोडमॅप बनला नाही. परंतु दुसरा टप्पा नक्कीच निघेल ज्यात राहुल गांधी सहभागी होतील. 

राहुल गांधी यांच्या नेतृत्वात दुसऱ्या टप्प्यात पदयात्रा तेव्हा निघेल जेव्हा देशातील महत्त्वाच्या राज्यात विधानसभा निवडणुकीचं वातावरण असेल. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान , कर्नाटकसारख्या राज्यात निवडणुका आहेत. पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहेत. २०२३ हे पूर्ण वर्ष काँग्रेस एक्टिव्ह राहण्याचा प्लॅन बनवला आहे. काँग्रेस छत्तीसगडच्या रायपूर इथं २४ ते २६ फेब्रुवारीपर्यंत अधिवेशन आयोजित करेल. ज्यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे संघटनात्मक निर्णय घेतील. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस