शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

प. बंगाल व उत्तर भारतावर सर्वच नेत्यांचे लक्ष; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मताधिक्य वाढविण्याची तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 04:34 IST

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात १९ मे रोजी होणाऱ्या मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, त्यात पंतप्रधान मोदी ...

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात १९ मे रोजी होणाऱ्या मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, त्यात पंतप्रधान मोदी यांचा वाराणसी मतदारसंघही आहे. उत्तर भारतात उष्णतेची लाट असून, आतापर्यंत बिहार व उत्तर प्रदेशात ५0 टक्क्यांपर्यंत मतदान झाले. शेवटच्या टप्प्यात अधिक मतदान व्हावे व पंतप्रधान मोदी यांचे मताधिक्य गेल्या वेळपेक्षा अधिक असावे, असा भाजपचा प्रयत्न आहे.

या टप्प्यासाठी पंतप्रधान मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा, व भाजपचे नेते अधिक सक्रिय झाले आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी, सपाचे प्रमुख अखिलेश यादव, बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी सभांचा धडाका लावला आहे. सॅम पित्रोडा यांच्या शीखविरोधी दंगलींबाबत विधानाचा पंजाबमध्ये फटका बसू नये, यासाठी काँग्रेस प्रयत्न करीत आहे. त्याचमुळे राहुल गांधी यांनी सोमवारीही पित्रोडा यांच्या विधानाचा जाहीरपणे निषेध केला.

काँग्रेसची सत्ता असलेल्या राजस्थानातील दलित महिलेवरील बलात्काराचे प्रकरण हा पंतप्रधान मोदींनी प्रचाराचा मुद्दा बनविला आहे. या प्रश्नावरून मायावती यांनी गेहलोत सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा, असे मोदी म्हणत आहेत. उत्तर प्रदेशात मायावती व अखिलेश यांच्या आघाडीचा सामना करणे शक्य नसल्याचे भाजपच्या लक्षात आल्याने तिथे त्या पक्षांवरच मोदी हल्ला चढवत आहेत. पश्चिम बंगालमध्ये मोदी व अमित शहा आणखी सभा घेणार असून, त्यामुळे तिथे भाजप व तृणमूल यांच्यातील कटुता वाढेल, असे दिसते.

या राज्यांमध्ये १९ मे रोजी मतदानया टप्प्यात उत्तर प्रदेश (१३ जागा), बिहार (८), पश्चिम बंगाल (९), मध्य प्रदेश (८), झारखंड (३), पंजाब (१३) हिमाचल प्रदेश (४) व चंदीगड (१) येथे आहे. पंजाब व हिमाचल प्रदेशातील सर्व जागांवर त्या दिवशी एकाच टप्प्यात मतदान होत आहे. बिहारमध्ये लढाई भाजप व राष्ट्रीय जनता दल यांच्यातच दिसत आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019