शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

पोलीस बंदोबस्तात ८०० क्विंटल भाजीपाल्याचा लिलाव

By admin | Published: July 21, 2016 10:23 PM

जळगाव : कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये किरकोळ व्यापारी किंवा खरेदीदार आणि अडतदार यांच्यात सहा टक्के अडत आणि एक टक्का बाजार शुल्कावरून सुरू झालेला वाद गुरुवारी काहीशा शांत झाला. फळ व भाजीपाला मार्केट यार्डमध्ये पहाटे ५.३० वाजताच लिलाव सुरू झाले. कुठलाही वाद झाला नाही. लिलाव सुरळीत व्हावेत यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, बाजार समितीचे पदाधिकारी व कर्मचारी आणि पोलीस बंदोबस्त तैनात होता.

जळगाव : कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये किरकोळ व्यापारी किंवा खरेदीदार आणि अडतदार यांच्यात सहा टक्के अडत आणि एक टक्का बाजार शुल्कावरून सुरू झालेला वाद गुरुवारी काहीशा शांत झाला. फळ व भाजीपाला मार्केट यार्डमध्ये पहाटे ५.३० वाजताच लिलाव सुरू झाले. कुठलाही वाद झाला नाही. लिलाव सुरळीत व्हावेत यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, बाजार समितीचे पदाधिकारी व कर्मचारी आणि पोलीस बंदोबस्त तैनात होता.
बाजार समितीने सलग तीन दिवस काही खरेदीदारांनी गोंधळ घातल्याने व भाजी खरेदीदार महिलांना इतर खरेदीदार महिलांकडून मारहाण झाल्याने औद्योगिक वसाहत पोलिसांनी एक दंगा नियंत्रण पथकाचे वाहन आणि चार कर्मचारी नियुक्त केले होते.
पहाटेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सरचिटणीस ॲड.हर्षल चौधरी, संजय घुगे, संभाजी सोनवणे, बाजार समितीचे सभापती प्रकाश नारखेडे, उपसभापती कैलास चौधरी आणि बाजार समितीचे १० ते १२ कर्मचारी लिलाव सुरळीत व्हावेत यासाठी फळे व भाजीपाला मार्केट यार्डात पोहोचले. त्यापाठोपाठ पोलिसही आले.
सर्व प्रतिनिधींनी शेतकरी, अडतदार आणि किरकोळ व्यापारी किंवा खरेदीदार यांना काही तक्रार असेल तर ती सांगा, लागलीच ती सोडवू, लिलाव प्रक्रिया सुरळीत पार पडू द्या, असे आवाहन केले.
यानंतर लिलाव सुरू झाले. लिलाव प्रक्रिया सुरळीत होईपर्यंत म्हणजेच दीत ते दोन तास शेतकरी व बाजार समितीचे प्रतिनिधी फळे व भाजीपाला मार्केट यार्डात उपस्थित होते.

पक्की बिले बंधनकारक
किरकोळ व्यापारी किंवा खरेदीदारांना भाजीपाला खरेदीनंतर पक्की बिले देण्यात येत आहेत की नाही याची तपासणी बाजार समिती प्रशासनाने केली. तसेच माल विकल्यानंतर शेतकर्‍यांना पावती दिले जात आहे की नाही याची माहिती शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी घेतली. शेतकर्‍यांनी अडत देऊ नये, आपली लुबाडणूक होत असेल तर तक्रार करावी, असे आवाहन ॲड.हर्षल चौधरी, संजय घुगे आदींनी केले. गुरुवारी खरेदीदारांना अडतदारांनी पक्की बिले दिली. कुठलीही तक्रार आली नाही, अशी माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली.

सहा टक्के अडत घेतली
अडतदारांनी भाजीपाला खरेदीदारांकडून सहा टक्के अडत आणि एक टक्का बाजार समिती शुल्क घेतले. त्याबाबतची बिलेही हातोहात देण्याची व्यवस्था केली होती.

रोज असणार पथक
फळे व भाजीपाला मार्केटमध्ये लिलाव सुरळीत पार पडावेत, शेतकर्‍यांच्या अडचणी सोडविल्या जाव्यात यासाठी पुढील काहीदिवसरोज१०कर्मचार्‍यांचेपथकनियुक्तकेेलेजाणारअसल्याचीमाहितीदेण्यातआली.