शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
2
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
3
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
5
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
6
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
7
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
8
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
9
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
10
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार
11
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
12
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
13
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
14
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
15
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
16
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
17
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
18
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
19
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला

तीन वाळू गटांचा अखेर लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2016 10:26 PM

जळगाव : २५ टक्क्याने किंमत कमी केलेल्या वाळू गटांपैकी शेवटच्या संधीतही जिल्ह्यातील केवळ तीनच वाळू गटांना बोली मिळाल्याने त्यांचाच लिलाव झाला. उर्वरित १७ गटांचा लिलाव आता होणारच नसल्याने त्याचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जळगाव : २५ टक्क्याने किंमत कमी केलेल्या वाळू गटांपैकी शेवटच्या संधीतही जिल्ह्यातील केवळ तीनच वाळू गटांना बोली मिळाल्याने त्यांचाच लिलाव झाला. उर्वरित १७ गटांचा लिलाव आता होणारच नसल्याने त्याचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्ह्यातील २० वाळू गटांना मागणी नसल्याने विभागीय आयुक्तांच्या मंजूरीनंतर त्यांची किंमत २५ टक्क्याने कमी करण्यात आली होती. त्यानुसार या गटांची चौथ्यांदा निविदा काढण्यात आली. ठेका घेण्याची शेवटची संधी होती. त्यातही केवळ तीनच गटांचा लिलाव होऊ शकला.
यामध्ये अमळनेर तालुक्यातील बोदर्डे (८६ लाख ५१ हजार), चोपडा तालुक्यातील खाचणे (३० लाख ५१ हजार) या गटांचा ठेका नंदुरबार येथील श्री साई गणेश बिल्डींग मटेरियल सप्लायर्स यांनी घेतला. तसेच पाचोरा तालुक्यातील बहुळा नदीवरील दूधखेडा (१३ लाख ८२ हजार ५००) गटाचा ठेका गुजरात अंबुजा एक्सपोर्ट लि. यांनी घेतला.

त्या १७ गटांचे काय?
या वाळू गटांची निविदा भरण्याची ही शेवटची संधी होती तरी १७ गटांचा लिलाव होऊ शकला नाही. या गटांची फेरनिविदा निघत नसेल तर त्यांचे काय? असा प्रश्न आता निर्माण होणार आहे. लिलाव झालाच नाही तर यामध्ये प्रशासनाचे मोठे नुकसान होणार असून या बाबत काय निर्णय होतो, याकडे आता लक्ष लागून आहे.