शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

देशभरातील सात लाख बनावट कंपन्यांना लागणार टाळं

By admin | Published: February 28, 2017 12:18 PM

काळ्या पैशाविरोधातील आपला लढा अधिक तीव्र करत केंद्र सरकारने आता आपला मोर्चा बनावट कंपन्यांकडे वळवला आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 - काळ्या पैशाविरोधातील आपला लढा अधिक तीव्र करत केंद्र सरकारने आता आपला मोर्चा बनावट कंपन्यांकडे वळवला आहे. या कंपन्यांची संख्या सहा ते सात लाखापर्यंत आहे. नोटाबंदीच्या काळात या बनावट कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात बँक व्यवहार केला असून बँकेतून पैसेही काढून घेतले आहेत. 
 
देशभरात एकूण 15 लाख नोंदणीकृत कंपन्या असून यामधील 40 टक्के कंपन्या बनावट असून संशयाच्या भोव-यात आहेत. त्यामुळे या 15 लाखांमधून त्या संशयित कंपन्यांचा शोध घेणे खूप अवघड काम असणार आहे. सरकारने या प्रक्रियेत अनेक संस्थेंचा समावेश करुन घेतला असून केंद्रीय प्रत्यक्ष कर (CBDT) महत्वाची भूमिका बजावणार आहे. 
 
'नोटाबंदीची घोषणा झाल्यानंतर दोन महिन्याच्या कार्यकाळात जेव्हा चलनातून बाद झालेल्या 500 आणि 1000 च्या नोटा बँकेत जमा करण्याची परवानगी देण्यात आली होती, तेव्हा या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात पैसा बँकेत जमा केला होता', अशी माहिती आयकर विभागाच्या अधिका-याने दिली आहे.
 
आयकर विभागाने या बनावट कंपन्यांच्या संपत्तीचीदेखील पुर्ण माहिती मिळवली आहे.  या कंपन्यांनी आतापर्यंत वार्षिक करपरतावा न भरल्याने त्या आयकर विभागाच्या रडारवर आहेत. या बनावट कंपन्यांकडून वसुली करण्यासाठी सरकारने सर्व महत्वाच्या महसूल गुप्तचर संस्थांना सामाविष्ट करुन घेतलं असून यामध्ये सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, आरबीआय, आयबी आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं आहे.
 
या बनावट कंपन्या असून यांच्याकडून कोणताही थेट व्यवहार होत नसून आपल्या ग्राहकांचा काळा पैसा करण्यासाठी यांचा वापर केला जातो.