शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अवधेश प्रसाद यांची मागच्या बाकावर रवानगी, लोकसभेतील जागेवरून अखिलेश यादव काँग्रेसवर नाराज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 16:44 IST

Lok Sabha Seats Allocation: अठराव्या लोकसभेमधील सदस्यांच्या आसन व्यवस्थेला अंतिम रूप देण्यात आलं आहे. मात्र या आसन व्यवस्थेवरून इंडिया आघाडीमधील घटक पक्षांमध्ये धुसफूस सुरू झाल्याचं दिसत आहे.

अठराव्या लोकसभेमधील सदस्यांच्या आसन व्यवस्थेला अंतिम रूप देण्यात आलं आहे. मात्र या आसन व्यवस्थेवरून इंडिया आघाडीमधील घटक पक्षांमध्ये धुसफूस सुरू झाल्याचं दिसत आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि त्यांच्या पत्नी डिंपल यादव यांनी नव्या बैठक व्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. विशेषकरून अयोध्येतील खासदार अवधेश प्रसाद यांना मागच्या बाकांवर पाठवण्याच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे.

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून अवधेश प्रसाद हे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासोबत पहिल्या रांगेत बसत असत. मात्र नव्या बैठक व्यवस्थेमध्ये अवधेश प्रसाद यांना दुसऱ्या रांगेतील आसन देण्यात आले आहे. मात्र आसन व्यवस्थेत केलेल्या बदलाची माहिती काँग्रेसने अखिलेश यादव यांना देण्यात आली नव्हती. बैठक व्यवस्थेत बदल करताना काँग्रेसने विश्वासात घेतले नाही, तसेच त्याची आधी माहितीही दिली नाही, असा आक्षेप अखिलेश यादव यांनी घेतला आहे.

इंडिया आघाडीमध्ये काँग्रेस हा मुख्य विरोधी पक्ष आहे. त्यामुळे लोकसभेतील विरोधी पक्षांच्या बाकांवरील आसन व्यवस्थेचं मित्रपक्षांमध्ये वाटप करण्याची जबाबदारी काँग्रेसवर होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारने पुढच्या रांगेत बसणाऱ्या समाजवादी पक्षाच्या सदस्यांची संख्या दोन वरून घटवून १ केली आहे. त्यामुळे केवळ अखिलेश यादव यांनाच पुढे बसता येणार आहे. हा प्रश्न सरकारसमोर उपस्थित न केल्याने अखिलेश यादव हे काँग्रेसवर नाराज आहेत.  

टॅग्स :lok sabhaलोकसभाAkhilesh Yadavअखिलेश यादवSamajwadi Partyसमाजवादी पार्टीcongressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी