शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

राम मंदिर बांधल्यानंतरच लग्न करण्याचा केला होता संकल्प; आता 33 वर्षांनी झाला विवाह

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2024 10:59 AM

एका कपलने 33 वर्षांपूर्वी अयोध्येत राम मंदिर बांधले जाईल आणि रामलला विराजमान होतील तेव्हाच लग्न करू, असा संकल्प केला होता. आता या कपलचा संकल्प पूर्ण झाला आहे.

राजस्थानमध्ये राहणाऱ्या एका कपलने 33 वर्षांपूर्वी अयोध्येत राम मंदिर बांधले जाईल आणि रामलला विराजमान होतील तेव्हाच लग्न करू, असा संकल्प केला होता. आता या कपलचा संकल्प पूर्ण झाला आहे. अयोध्येच्या कारसेवकपुरम परिसरात त्यांनी विवाह केला आहे. या लग्नाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. 

जयपूर, राजस्थानचे रहिवासी असलेले डॉ. महेंद्र भारती हे 1990 साली लग्नासाठी पात्र झाले होते, पण त्याचवेळी कारसेवकांवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने ते खूप व्यथित झाले. त्यांनी त्याचवेळी एक संकल्प केला होता. जोपर्यंत अयोध्येत भगवान रामाचे भव्य मंदिर बांधले जात नाही तोपर्यंत लग्न करणार नाही असा संकल्प केला होता. 

रामलला विराजमान झाल्यानंतर आता डॉ. महेंद्र भारती यांनी अजमेर येथील रहिवासी असलेल्या डॉ. शालिनी गौतम यांच्याशी अयोध्येत लग्न केलं आहे. 33 वर्षांनी हा संकल्प पूर्ण झाल्यानंतर या कपलने लग्न केलं. 

डॉ. महेंद्र हे 20 वर्षांहून अधिक काळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आहेत. त्यांची जीवनसाथी शालिनी गौतम कॉलेजमध्ये शिकवते. लग्नासाठी यापेक्षा चांगली संधी असूच शकत नाही, असंही ते म्हणाले. सनातन संस्कृतीच्या पुनर्स्थापनेचा हा काळ आहे. त्यामुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही हे खूप महत्त्वाचं असल्याचं सांगितलं आहे.

डॉ. महेंद्र भारती म्हणाले की, मी खूप आनंदी आहे, खूप भारावून गेलो आहे. हा क्षण माझ्या आयुष्यात शुभसंकेत म्हणून आला आहे. 1990 मध्ये मी संकल्प केला होता की प्रभू श्री रामाचे मंदिर बांधले जाईल तेव्हाच मी लग्न करेन आणि भव्य मंदिरात त्यांचे दर्शन घेईन. माझी इच्छा पूर्ण झाली आहे.   

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याmarriageलग्न