शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
4
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
5
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
6
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
7
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
8
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
9
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
10
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
11
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
12
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
13
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
14
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
15
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
16
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
17
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
18
भारतात फुलटाइम स्टॉक ट्रेडर बनण्यासाठी जवळ किती पैसे असायला पाहिजे?
19
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
20
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला

आता दिल्लीत १० लाखांपर्यंतचे उपचार मिळणार मोफत; जाणून घ्या आयुष्मान कार्ड कसे बनवायचे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 13:26 IST

Ayushman Bharat Yojana : शपथविधी सोहळ्यानंतर दिल्ली सरकारच्या मंत्रिमंडळाने दिल्लीत आयुष्मान योजना लागू करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे.

Delhi Ayushman Card : नवी दिल्ली : दिल्लीत नुकतेच भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. दिल्लीतील विधानसभा निवडणुकीवेळी भाजपने सरकार स्थापन झाल्यानंतर आयुष्मान भारत योजनेअंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार नागरिकांना दिले जातील, असे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी शपथ घेतल्यानंतर काही तासांतच आपल्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत या आयुष्मान भारत योजनेला मंजुरी दिली आहे. आता दिल्लीतही जन आरोग्य योजना लागू केली जाणार आहे. याअंतर्गत, १ लाख लोकांसाठी प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे कार्ड बनवले जातील. 

आयुष्मान भारत योजना अद्याप दिल्लीत लागू झालेली नव्हती. मागील केजरीवाल सरकारने ही योजना लागू केली नव्हती. दरम्यान, आता केंद्र सरकारने आयुष्मान भारत योजनेसंबंधी अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण दिल्लीत सुरू केले आहे. दिल्ली सरकारच्या अधिकाऱ्यांना दिल्लीतील लोकांसाठी आयुष्मान भारत कार्ड कसे बनवायचे याचे प्रशिक्षण दिले जात आहे. विशेष म्हणजे, कालच शपथविधी सोहळ्यानंतर दिल्ली सरकारच्या मंत्रिमंडळाने दिल्लीत आयुष्मान योजना लागू करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे.

दिल्लीकरांना होणार डबल लाभआयुष्मान कार्ड बनवल्यानंतर, कार्डधारकाला दरवर्षी ५ लाख रुपयांचे मोफत उपचार दिले जातात. कार्डधारक नोंदणीकृत रुग्णालयांमध्ये या उपचारांचा लाभ घेऊ शकतात, ज्याचा संपूर्ण खर्च सरकार करते. यामध्ये दिल्ली सरकारकडून ५ लाख रुपयांचे आणि केंद्र सरकारकडून ५ लाख रुपयांचे आरोग्य विमा देण्यात येईल. म्हणजेच, देशातील उर्वरित भागात, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जातात. दिल्लीत आयुष्मान भारत योजना लागू झाल्यानंतर दिल्लीकरांना ५ लाख रुपयांच्या डबल लाभ मिळणार म्हणजेच १० लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतील.

आयुष्मान कसे कार्ड बनवायचे?जर तुम्हाला तुमचे आयुष्मान कार्ड बनवायचे असेल तर आधी तुम्ही पात्र आहात की नाही हे तपासावे लागेल. यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmjay.gov.in ला भेट द्यावी लागेल. यानंतर तुम्हाला येथे 'Am I Eligible' या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला येथे तुमचा 10 अंकी मोबाइल क्रमांक भरावा लागेल ज्यावर OTP येईल. आता हा OTP आणि स्क्रीनवर दिलेला कॅप्चा कोड भरून लॉगिन करा. यानंतर योजना निवडून आपलं राज्य आणि तुमचा जिल्हा निवडा. यानंतर, 'Search By' वर जा आणि आधार सारखे कोणतेही एक दस्तऐवज निवडा आणि नंतर तुमचा आधार क्रमांक भरा आणि कॅप्चा देखील प्रविष्ट करा. 

आता सर्च वर क्लिक केल्यानंतर तुम्ही पात्र आहात की नाही हे समजेल. जर तुम्ही पात्र असाल तर तुम्ही आयुष्मान कार्ड बनवू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या CSC केंद्रावर जाऊ शकता.संबंधित अधिकारी तुमची पात्रता तपासून काही कागपत्रांची मागणी करेल. त्यानंतर ही कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होते. अर्ज केल्यानंतर, तुमचे आयुष्मान कार्ड काही वेळात तयार होईल जे तुम्हाला डाउनलोड करावे लागेल.यानंतर, या कार्डद्वारे तुम्ही योजनेअंतर्गत नोंदणीकृत रुग्णालयात दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार घेऊ शकता.

कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?- आधार कार्ड- रेशन कार्ड किंवा कुटुंब ओळखपत्र (पीपीपी आयडी)- मोबाईल नंबर- पात्रता यादीतील नाव- जात प्रमाणपत्र (राखीव प्रवर्गातून असल्यास)- उत्पन्नाचा दाखला- कुटुंबाच्या सध्याच्या स्थितीशी संबंधित कागदपत्रे

टॅग्स :ayushman bharatआयुष्मान भारतdelhiदिल्लीHealthआरोग्य