शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

Babri Masjid Demolition Verdict : जफरयाब जिलानी म्हणाले, निकाल अमान्य, उच्च न्यायालयात आव्हान देणार

By बाळकृष्ण परब | Published: September 30, 2020 3:32 PM

Babri Masjid Demolition Verdict : बाबरी मशीद पाडल्या प्रकरणी निकाल देताना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने निकाल दिला. यावेळी न्यायालयाने ही मशीद पूर्वनियोजितरीत्या पाडले गेली नसून जे काही घडले अचानच घडल्याचे अधोरेखित करत या प्रकरणामधील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती.

ठळक मुद्देहा निकाल कायदा आणि पुराव्यांविरोधात आहे१९९४ पासून उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय गुन्हा घडल्याचे सांगत आहेकलम १९८ आणि १९७ अन्वये हा गुन्हा आहे. अशा परिस्थितीत या सर्वांना मुक्त करणे एकदम चुकीचे आहे

लखनौ - बाबरी मशीद पाडल्या प्रकरणी दीर्घकाळ सुरू असलेल्या खटल्यावर अखेर आज लखनौमधील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने निकाल दिला. यावेळी न्यायालयाने ही मशीद पूर्वनियोजितरीत्या पाडले गेली नसून जे काही घडले अचानच घडल्याचे अधोरेखित करत या प्रकरणामधील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. दरम्यान, या निकालानंतर भाजपाच्या गोटात समाधानाचे वातावरण असले तरी बाबरी मशीदच्या बाजूने असलेल्या मंडळींनी वरच्या न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे. बाबरी मशीद प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिलेल्या निकालाला हायकोर्टात आव्हान देणार असल्याचे प्रसिद्ध वकील जफरयाब जिलानी यांनी सांगितले आहे.लखनौमधील सीबीआय न्यायालयाने आज निकाल सुनावताना ३२ आरोपींना मुक्त केल्यानंतर निकालाबाबत प्रतिक्रिया देताना सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाचे वकील जफरयाब जिलानी म्हणाले की, हा निकाल कायदा आणि पुराव्यांविरोधात आहे. १९९४ पासून उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय गुन्हा घडल्याचे सांगत आहे. तसेच वरिष्ठ अधिकारी आणि प्रसारमाध्यमांतील लोकांनी या लोकांचे नाव घेतले होते. दरम्यान, लालकृष्ण अडवाणींसारखे अन्य नेते एक धक्का और दो, बाबरी मशीद तोड दो अशा घोषणा द्यायचे.कलम १९८ आणि १९७ अन्वये हा गुन्हा आहे. अशा परिस्थितीत या सर्वांना मुक्त करणे एकदम चुकीचे आहे. आम्ही आता या निकालाला हायकोर्टात आव्हान देणार आहोत, अशी माहिती जिलानी यांनी दिली.बाबरी मशीद प्रकरणातील सर्व आरोपींची आज न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली होती. याप्रकरणी  माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी, माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी, उमा भारती, भाजपा नेते विनय कटियार, महंत नृत्य गोपाल दास आणि साध्वी ऋतंभरा यांच्यासह 32 जण आरोपी होते. बाबरी विध्वंस प्रकरणात एकूण 49 आरोपी होते. मात्र, यातील 17 जणांचे सुनवणीदरम्यान निधन झाले होते. दरम्यान, बाबरी मशीद पतन प्रकरणी लखनौमधील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज ऐतिहासिक निकाल दिला आहे. बाबरी मशिदीचे झालेले पतन हे पूर्वनियोजित नव्हते असे निरीक्षण न्यायालयाने आपल्या दोन हजार पानांच्या निकालपत्रान नोंदवले असून, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह इतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे

टॅग्स :babri masjid verdictबाबरी मशीद निकालbabri masjidबाबरी मस्जिदAyodhyaअयोध्याCourtन्यायालय