शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
4
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
5
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
6
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
9
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
10
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
11
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
12
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
13
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
14
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
15
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
16
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
17
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
18
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
19
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
20
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली

बाबरी, गोधरामुळे मनं बिघडली म्हणून तरुण दहशतवादाकडे !

By admin | Published: June 13, 2016 6:22 AM

भारतीय उपखंडात या दहशतवादी संघटनेची (एक्यूआयएस) पाळेमुळे रोवण्याचा चंग बांधून आहेत, असा दावा दिल्ली पोलिसांनी न्यायालयात केला आहे.

दिल्ली पोलिसांचा दावानवी दिल्ली : इ.स. १९९२ चा बाबरी मशीद विध्वंस आणि २००२ च्या गोधरा दंगलींमुळेच भारतीय तरुण अल कायदा या दहशतवादी संघटनेकडे आकर्षित झाले आणि आज हे तरुण भारतीय उपखंडात या दहशतवादी संघटनेची (एक्यूआयएस) पाळेमुळे रोवण्याचा चंग बांधून आहेत, असा दावा दिल्ली पोलिसांनी न्यायालयात केला आहे.दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने १७ आरोपींविरुद्ध अतिरिक्त सत्र न्यायाधीश रितेश सिंग यांच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रातील माहितीनुसार विविध मशिदींमध्ये जिहादी भाषण दिल्यावर अटकेतील आरोपी सईद अंजार शाह हा मोहम्मद उमरला (फरार आरोपी) भेटला आणि त्यांनी भारतात मुस्लिमांवर होणारे कथित अत्याचार; प्रामुख्याने गोधरा व बाबरी मशिदीच्या मुद्द्यावर चर्चा केली. शाहच्या विचारांनी उमर प्रभावित झाला व त्याने स्वत:ला जिहादासाठी झोकून दिले. त्याने पाकिस्तानात शस्त्रास्त्र आणि दारूगोळ्याचे प्रशिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली. तो पाकिस्तानातून सर्व कारवायांवर नियंत्रण ठेवायचा. आरोपी अब्दुल रहमानने पाकिस्तानी दहशतवादी सलीम, मन्सूर आणि सज्जादला भारतात सुरक्षित आश्रय दिला. हे तिघेही जैश-ए-मोहम्मदचे सदस्य होते. इ.स. २००१ साली उत्तर प्रदेशात झालेल्या गोळीबारात ते ठार झाले. तीनही पाकिस्तानी दहशतवादी बाबरी मशीद विध्वंसाचा बदला घेण्यासाठी भारतात आले होते. अयोध्येतील राममंदिरावर हल्ला करण्याची त्यांची योजना होती.

(वृत्तसंस्था)>काही जण पाकला गेलेजिहादसाठी काही तरुण पाकिस्तानात गेले आणि तेथे त्यांनी जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईद, लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख झकी उर रहमान लखवी व इतर जहाल दहशतवाद्यांची भेट घेतली, असेही या आरोपपत्रात नमूद आहे.