शहरं
Join us  
Trending Stories
1
Baba Siddique : कुरिअरने दिलं पिस्तूल, एडवान्स पेमेंट; बाबा सिद्दिकींच्या हत्येचा बनवला होता 'मास्टर प्लॅन'
2
'नेत्यांची दिवसाढवळ्या हत्या होणं म्हणजे महाराष्ट्रातील गृहखातं फेल'; अजितदादांच्या आमदाराने देवेंद्र फडणवीसांच्या खात्याला फटकारलं
3
बाबा सिद्दिकींची संपत्ती किती? ईडीने ४६२ कोटींची मालमत्ता जप्त केलेली, सहा महिन्यांपूर्वीच आले राष्ट्रवादीत
4
Baba Siddique : लॉरेन्स बिश्नोई गँगने पंजाब जेलमध्ये रचला बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट, अडीच लाखांची सुपारी अन्...
5
Rahul Gandhi : "महाराष्ट्रातील कायदा, सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली; सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे"
6
आज अजित पवारांच्या स्टेजवर जाणार; काँग्रेसच्या निलंबनानंतर आमदार सुलभा खोडकेंची घोषणा
7
बाबा सिद्दिकींच्या जवळचाच कोणीतरी हल्लेखोरांना माहिती देत होता? पोलिसांना संशय, दोन आरोपी ताब्यात
8
Supriya Sule : "राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा..."; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सुप्रिया सुळेंची पोस्ट
9
कोण होते बाबा सिद्दिकी? ज्यांनी मिटवला होता सलमान आणि शाहरुख खानमधील वाद, बॉलिवूडशी होतं खास कनेक्शन
10
रामलीलामध्ये कुंभकर्णाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा हार्ट अटॅकने मृत्यू, खाली कोसळला अन्...
11
माझ्या गावचा मुलगा, घरकुल नाही आम्ही त्याला चांगले मोठे घर बांधून देणार; अजित पवारांच्या सूरजबाबत मोठ्या घोषणा
12
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर रितेश देशमुखची संतप्त पोस्ट, म्हणाला- "गुन्हेगारांना..."
13
बाबा सिद्दिकींना गोळी लागल्याचे कळताच सलमान, संजय दत्त, शिल्पा शेट्टीची रुग्णालयाकडे धाव
14
आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२४; दिलेले पैसे वसूल करता येतील, विवाहेच्छुकांसाठी आशादायी...
15
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
16
दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’
17
अंतराळातून टेहळणीसाठी भारत प्रक्षेपित करणार तब्बल ५२ उपग्रह; पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार करडी नजर
18
दसऱ्याच्या दिवशी ईडीची छापेमारी, रांचीत खळबळ
19
जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 
20
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी

मृत्यूनंतरही होताहेत हाल! रुग्णवाहिका न मिळाल्याने महिलेने गमावला जीव; 4 महिलांनी नेला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 11:23 AM

वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे.

नवी दिल्ली - देशातील विविध क्षेत्रांत प्रगती झाली असली तरी आजही अनेक ठिकाणी योग्य सोयीसुविधा पोहोचलेल्या नाहीत. जीवनावश्यक गोष्टींसाठी देखील कित्येक लोकांना संघर्ष करावा लागतो. महत्त्वाच्या गोष्टी उपलब्ध नसल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे मध्य प्रदेशमध्ये आरोग्य विभागाची परिस्थिती किती वाईट आहे हे दाखवणारी घटना घडली आहे. वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. 

धक्कादायक बाब म्हणजे मृत्यूनंतर देखील हाल झाले. कारण मृतदेह घेऊन जाण्यासाठी देखील वाहन न मिळाल्याने चार महिलांवर तो मृतदेह घेऊन जाण्याची वेळ आली. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या रीवा जिल्ह्यामध्ये ही हृदयद्रावक घटना घडली आहे. एका 80 वर्षीय महिला जिवंत असताना रुग्णवाहिका मिळाली नाही आणि नंतर मृत्यू झाल्यावर देखील शववाहिनी उपलब्ध झालं नाही. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये 4 महिला आपल्या खांद्यावर एका वृद्ध महिलेचा मृतदेह घेऊन जात आहेत. 

मध्य प्रदेशच्या रीवा जिल्ह्यातील रायपूर महसुआ गावातील हा व्हिडिओ  आहे. यात शववाहिनी उपलब्ध नसल्याने 4 महिलांनी महिलेचा मृतदेह खांद्यावर उचलून नेला मृतदेह खांद्यावर घेऊन या महिलांना तब्बल 5 किलोमीटर चालावं लागलं आहे.  80 वर्षीय वृद्ध महिलेची तब्येत बिघडल्याने तिला रुग्णालयात नेण्यासाठी कुटुंबीयांनी रुग्णवाहिका बोलावली. अनेक तास प्रतीक्षा करूनही रुग्णवाहिका न आल्याने कुटुंबीयांनी महिलेला खाटेसह उचलून सामुदायिक आरोग्य केंद्रात नेलं. तिथे डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केलं. 

कुटुंबीयांचा त्रास कमी झाला नाही, कारण रुग्णवाहिकेनंतर कुटुंबीयांना शववाहिनी मिळाली नाही. अखेर घरातील 4 महिला आणि एका मुलीने मिळून खांद्यावरच वृद्ध महिलेचा मृतदेह उचलून दोन तासात 5 किमी प्रवास केला आणि अखेर आपल्या घरी पोहोचले. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, केवळ रेडक्रॉस जिल्हा मुख्यालयात शववाहिनी दिली जाते. इतर ठिकाणी शववाहिकेची सोय नाही. रुग्णांना केवळ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकारची आहे. मृत्यूनंतर मृतदेह आपणच व्यवस्था करूनच घेऊन जावा लागत असल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश