शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

बेताल गोरक्षकांवर सक्तीने बडगा उगारा; मोदींचा आदेश

By admin | Published: July 17, 2017 3:07 AM

गोरक्षणाच्या नावाने कायदा हाती घेण्याऱ्या बेताल गोरक्षकांवर सक्तीने बडगा उगारावा, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : गोरक्षणाच्या नावाने कायदा हाती घेण्याऱ्या बेताल गोरक्षकांवर सक्तीने बडगा उगारावा, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये गोरक्षणाच्या नावाखाली काही जणांची हत्या झाली होती. गोभक्तीच्या नावाने केल्या जाणाऱ्या हत्या खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे गेल्या महिन्यात साबरमती आश्रमातून सांगणाऱ्या मोदींनी अतिउत्साही व स्वयंभू गोरक्षकांना हा दुसऱ्यांदा इशारा दिला आहे.सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येस झालेल्या बैठकीत बोलताना, पंतप्रधानांनी गोरक्षकांविषयी केलेल्या वक्त्तव्याची माहिती नंतर संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांनी पत्रकारांना दिली.अनंत कुमार यांच्या म्हणण्यानुसार मोदी असे म्हणाले की, गोरक्षणाच्या नावाने कोणाही व्यक्तीला अथवा गटाला कायदा हातात घेऊ दिला जाऊ शकत नाही. असे करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यास राज्यांना सांगण्यात आले आहे.गाय मारणाऱ्यास १४ वर्षे शिक्षा; पण माणूस मारणाऱ्यास फक्त दोन वर्षे -देशाच्या विविध राज्यांत गाय मारणाऱ्यास पाच, सात किंवा १४ वर्षे तुरुंगवास ठोठावण्याचे कायदे आहेत. मात्र, बेदरकारपणे वाहन चालवून एखाद्याकडून दुसऱ्या माणसाचा मृत्यू झाल्यास त्याला मात्र कायद्यात फक्त दोन वर्षे तुरुंगवासाची तरतूद आहे. दिल्लीच्या एका न्यायाधीशांनीच एका हिट अँड रन खटल्याचा निकाल देताना कायद्यातील अशा विसंगतीवर बोट ठेवले. विरोधकांवरही शरसंधान केले-काही पक्ष राजकीय लाभासाठी गोरक्षणाच्या विषयाला राजकीय रंग देत आहेत, असा आरोप करून पंतप्रधान म्हणाले की, याला राजकीय अथवा सांप्रदायिक रंग दिला जाऊ नये, कारण असे करण्यात देशाचे काहीच भले होणार नाही. त्याऐवजी एकत्र येऊन या अनिष्ट गोष्टीचे उच्चाटन करावे.सोमवारपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनातही विरोधक हा मुद्दा आग्रहाने मांडतील, याची जाणीव ठेवून त्यांची धार बोथट करण्यासाठी पंतप्रधानांनी हे कडक भाष्य केले असावे, असे मानले जात आहे.देशात गोरक्षणाचा कायदा आहे, परंतु व्यक्तिगत दुस्वासापोटी केले जाणारे गुन्हे खपवून घेतले जाऊ शकत नाहीत. -नरेंद्र मोदीलालू यादवांना मोदींच्या आडून कानपिचक्या-राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजस्वीप्रसाद यादव यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपावरून बिहारचे उपमुख्यमंत्रिपद सोडावे, यासाठी जोरदार दबाव येत आहे.मात्र, राजदने त्यास ठाम नकार दिला आहे. या पार्श्वभूमिवर, सरकारने भ्रष्टाचाराविरुद्ध सुरू कलेल्या लढ्यास सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन करताना मोदींनी लालूंना अप्रत्यक्षपणे कानपिचक्या दिल्या.भ्रष्टाचाऱ्यांना कोणीही पाठीशी घालू नये, कारण त्यामुळे समाजात राजकीय नेत्यांची प्रतिमा मलीन होते, असे ते म्हणाले.