शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

“राम हा राजकारणाचा विषय नाही, भारताला विश्वगुरु करणारे सरकार निवडले पाहिजे”: बागेश्वर बाबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 16:23 IST

Bageshwar Bab Dhirendra Krishna Shastri News: रामाच्या नावावर राजकारण करुन आपली पोळी भाजून घेणे हा मूर्खपणा आहे, अशी टीका बागेश्वर बाबा यांनी केली.

Bageshwar Bab Dhirendra Krishna Shastri News: २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामलला प्राणप्रतिष्ठापना सोहळा होत आहे. या भव्य सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. देशभरात या सोहळ्याची धूम पाहायला मिळत आहे. विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असून, प्रभू श्रीराम आणि राम मंदिरावरून दावे, आरोप केले जात आहेत. अशातच बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यानी राम हा राजकारणाचा विषय नसल्याचे म्हटले आहे. 

एका मुलाखतीत बोलताना बागेश्वर बाबा म्हणाले की, राजकारण धर्माने चालते. धर्माचे राजकारण केले जात नाही. भारतातील नागरिकांमध्ये जागृती झाली आहे. आता त्यांनी मत त्यांच्या बुद्धीला अनुसरुन दिले पाहिजे. भारत विश्वगुरु झाला पाहिजे हा दृष्टीकोन असणारे सरकारच निवडले पाहिजे. राम म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम. राम म्हणजे संपन्नता, अखंडता, एकता आहे. रामाच्या नावावर राजकारण करुन आपली पोळी भाजून घेणे हा मूर्खपणा आहे, अशी टीका बागेश्वर बाबा यांनी केली. 

ज्ञानवापीत शंकर आहेत यात दुमत असण्याचे कारण नाही

ज्ञानवापी मशिदीबाबत वाद सुरू आहे. यावर बोलताना धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले की, ज्ञानवापीत शंकर आहेत, यात दुमत नाही. तसेच मथुरा ही कृष्णाची आहे, यातही शंका नाही. देशात न्यायालय आहे. ASIला जे पुरावे मिळाले आहेत, त्यावरुन हे सिद्ध होते की तिथे सनातन धर्मच आहे. मोहम्मद घोरी, अकबर, बाबर यांनी आक्रमणे केली. मंदिरांवर जे हल्ले झाले, ज्या जखमा केल्या गेल्या ते घाव भरले जात आहेत. आताचा काळ हिंदू धर्मासाठी आणि हिंदूंसाठी सुवर्णकाळ आहे, असे बागेश्वर बाबा यांनी नमूद केले. 

दरम्यान, राम आपला बहुजनांचा आहे. राम शिकार करून मांसाहार करत होता. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात. आम्ही रामाचा आदर्श मानतो आणि मांसाहारी अन्न खातो. १४ वर्ष वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार, असे विधान जितेंद्र आव्हाड यांनी केले. यावर बोलताना, रामाच्या नावावरुन राजकारण व्हायला नको, असे बागेश्वर बाबा म्हणाले. 

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धामRam Mandirराम मंदिर