शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Elections: अजित पवारांचा पहिला उमेदवार ठरला! फोनवरून नावाची केली घोषणा
2
"मिस्टर शिंदे, ठाकरेंवर बोलताना हे विसरू नका", 'त्या' ट्विटवरून राऊत भडकले
3
आचारसंहितेपूर्वी आरक्षण द्या,अन्यथा आगामी निवडणुकीत सरकारला पश्चाताप होईल: मनोज जरांगे
4
धक्कादायक! टार्गेट पूर्ण करण्यासाठी दबाव, पगार कापण्याची धमकी; मॅनेजरने उचललं टोकाचं पाऊल
5
"सरकार म्हणजे विषकन्या, सबसिडीच्या भरवशावर राहू नका! लाडकी बहीण सुरू केल्यामुळे..."; नितीन गडकरींचं विधान चर्चेत
6
पोलिसांनी चौकशीला बोलावल्यानंतर Book My Showचे सीईओ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
7
स्वत:शीच लग्न करणाऱ्या जगप्रसिद्ध रिलस्टारने संपविले आयुष्य; चिठ्ठी सापडली
8
पहिल्यांदाच बोनस शेअर देण्याची तयारी; ६ महिन्यांत 'या' शेअरनं दुप्पट केला पैसा, तुमच्याकडे आहे का?
9
पितृपक्ष: सर्वपित्री अमावास्येला ‘असे’ करा श्राद्ध; पूर्वज होतील प्रसन्न, समाधानाने तृप्त!
10
दुसऱ्या लग्नातही सुख नाही, नव्या नवरीनं उचललं टोकाचं पाऊल; पती फोनवर असं काय बोलला?
11
सुपर कॅच! सिराज अगदी स्प्रिंगसारखा वाकला; शेवटच्या टप्प्यात शाकिबचा 'करेक्ट कार्यक्रम'
12
फिट राहा! २ वेळा भात खाल्ल्याने वजन वाढतं?; दिवसातून किती वेळा, किती प्रमाणात खावा, जाणून घ्या
13
IND vs BAN : 'हिटमॅन' रोहित झाला 'सुपरमॅन'; हवेत उडी मारुन एका हातात पकडला कॅच (VIDEO)
14
वर्षाताई बाहेर जायला हव्या होत्या! पॅडीच्या एक्झिटनंतर प्रेक्षक नाराज, म्हणाले- "बिग बॉस स्वत:च्या मनाने..."
15
SBI ची सुपरहिट स्कीम : एकदा करा डिपॉझिट, दर महिन्याला होईल कमाई; पाहा संपूर्ण डिटेल्स
16
नवरात्रोत्सव: १० राशींना नवदुर्गेचे वरदान, अकल्पनीय लाभ; धनलक्ष्मीची अपार कृपा, शुभच होईल!
17
लाडकी बहीण योजनेवर नितीन गडकरींचं एक विधान; सरकारची झाली कोंडी, विरोधकांनी घेरलं
18
"उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचा अपघाताआधी मागितला होता राजीनामा", कदमांचा गौप्यस्फोट
19
पाकिस्तानला मोठा झटका! ६ मंत्रालयांना टाळे, दीड लाख नोकऱ्या गेल्या; आयएमएफकडून कर्जासाठी लोटांगण
20
Nepal Flood : पुराचे थैमान! नेपाळमध्ये परिस्थिती गंभीर; १७० जणांचा मृत्यू, १११ जण जखमी, ४२ बेपत्ता

बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री पुन्हा बॅकफूटवर, Tweet करत व्यक्त केली दिलगिरी; जाणून घ्या आता काय आहे प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 8:20 PM

परशुराम जयंतीच्या निमित्ताने पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी सोशल मिडियाच्या माध्यमाने आपल्या भक्तांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी भक्तांच्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिले.

भोपाळ - आपल्या वक्तव्याने नेहमीच चर्चेत आणि वादात असणारे बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री पुन्हा एकदा बॅकफूटवर आले आहेत. हैहयवंशी क्षत्रिय समाजा संदर्भात केलेल्या एका वक्तव्यावर आता धीरेंद्र शास्त्री यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “गेल्या काही दिवसांत एक विषय लक्षात आला आहे. एका चर्चेदरम्यान, मी भगवान परशुरामजी आणि महाराज सहस्त्रबाहू अर्जुनजी यांच्यात झालेल्या युद्धासंदर्भात जे काही बोललो, ते पवित्र हिंदू धर्मग्रंथांतील वर्णनाच्या आधारे बोललो आहे. आपला उद्देश कोणत्याही समाजाच्या अथवा वर्गाच्या भावना दुखावण्याचा नव्हता. ना कधी असेल. कारण आपण नेहमीच सनातन एक्याच्या बाजूने राहत आलो आहोत. तरीही, जर आपल्या कुठल्याही शब्दामुळे कुणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील तर आम्ही दिलगीर आहोत. आपण सर्व हिंदू एक आहोत. एकच राहू. आमची एकता हीच आमची शक्ती आहे." असे ट्विट बागेश्वर धामच्या टि्वटर हँडलवर करण्यात आले आहे.

परशुराम जयंतीच्या दिवशी करण्यात आले होते वक्तव्य -परशुराम जयंतीच्या निमित्ताने पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी सोशल मिडियाच्या माध्यमाने आपल्या भक्तांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी भक्तांच्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिले. याच वेळी, त्यांनी भगवान परशुरामा यांच्या संदर्भात सांगायला सुरुवात केली आणि म्हणाले की, "हे क्षत्रिय अचानकपणे कुठून प्रकट व्हायचे?  यासंदर्भात थोडी चर्चा करू. सहस्त्रबाहू ज्या घराण्यातील होता तो हैहय वंश होता. भगवान परशुरामांनी हैहय वंशाचा नाश करण्यासाठी हातात कुऱ्हाड घेतली. हैहय वंशाचा राजा अत्यंत दुष्ट, ऋषींवर अत्याचार करणारा आणि स्त्रियांवर बलात्कार करणारा होता." 

एवढ्यावरच बाबा बागेश्वर थांबले नाही, ते पुढे म्हणाले, दुष्टांना मार्गातून बाजूला करणे हे साधूंचे कामच आहे. यामुळे त्यांनी हैहय वंशाच्या राजांना मारायला सुरुवात केली. मात्र आपल्या शास्त्रांच्या मर्यादांचे पालन करत त्यांनी, ना कधी स्त्रियांवर आपला परशू उचलला, ना मुला-मुलींवर. त्यानी आताताई राजांचा वध केला. पण त्यांच्या मुलांना हात लावला नाही. पण जेव्हा ती मुले तरुण झाली आणि त्यांनीही अत्याचार सुरू केले, त्यांनीही आपल्या वडिलांचा बदला घेण्यासाठी भगवान परशुराम यांच्यावर हल्ला केला, तेव्हा भगवान परशुरामांनी त्या त्यांचा वध केला, नंतर त्यांना मुले झाली, त्यांचाही वध केला.

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धामMadhya Pradeshमध्य प्रदेश