शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
2
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
3
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
4
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
5
Mumbai Rain: मुंबईच्या पूर्व उपनगरात तुफान पाऊस; भांडूप, मुलुंडमध्ये रस्त्याला आलं नदीचं रुप!
6
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
7
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
8
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
9
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
10
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
11
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
12
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
13
‘लाडकी बहीण’ योजनेत पुन्हा गैरप्रकार समोर; ६ लाडक्या भावांचे अर्ज, ‘असा’ लागला शोध
14
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
15
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
16
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
17
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली
18
“ब्रिजभूषण सिंहचा एन्काउंटर का केला नाही, RSSच्या लोकांना वाचवायला अक्षय शिंदेला संपवले”
19
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
20
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

भारीच! शेतकरी वडिलांच्या हत्येने लेक हादरला; IAS होण्याचा निर्णय घेतला; 'असा' होता यशस्वी प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 11:30 AM

यूपीएससी परीक्षेत यश मिळवण्याचा प्रवास बजरंग यादवसाठी अजिबात सोपा नव्हता, पण वडिलांच्या निधनानंतर त्याने ठरवलं की यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकारी व्हायचं आहे. 

उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात राहणाऱ्या बजरंग यादवची प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे. बजरंगने देशातील नागरी सेवा परीक्षेत 454 वा रँक मिळवला आहे आणि संपूर्ण जिल्ह्याचं नाव मोठं केलं आहे. यूपीएससी परीक्षेत यश मिळवण्याचा प्रवास बजरंग यादवसाठी अजिबात सोपा नव्हता, पण वडिलांच्या निधनानंतर त्याने ठरवलं की यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकारी व्हायचं आहे. 

आज तकशी संवाद साधताना बजरंगने सांगितले की, 'माझे वडील राजेश यादव हे व्यवसायाने शेतकरी होते. ते गावातील शेतीसोबतच गरीब, असहाय्य लोकांना मदत करत असत. माझ्या वडिलांचे हे काम काही लोकांना आवडलं नाही आणि त्यांनी 2020 मध्ये माझ्या वडिलांची कट रचून हत्या करण्यात आली. या घटनेने मला हादरवून सोडलं, त्यानंतर मी आयएएस होण्याचा निर्णय घेतला. मेहनतीचे फळ मिळाले आणि देशभरातून यूपीएससी परीक्षेत 454 वा रँक मिळाला.

बजरंगला ४ भाऊ आणि एक बहीण आहे, ज्यामध्ये अंबिका यादव घरातील कामे पाहते.  बजरंगच्या या यशावर आजी रेश्मा देवी, काका दिनेश यादव, काका उमेश यादव, काकू सुमनदेवी, मंजू देवी यांनी आनंद व्यक्त केला आहे. बजरंगचे प्राथमिक शिक्षण गावातूनच झाले. दहावीची परीक्षा लिटल फ्लॉवर स्कूल कलवारी येथे तर इंटरमिजिएटची परीक्षा उर्मिला एज्युकेशनल अकॅडमी बस्ती येथे झाली. 

2019 मध्ये, त्याने अलाहाबाद विद्यापीठातून B.Sc Maths केले आणि दिल्लीत UPSC ची तयारी करत होता. बजरंगच्या या यशानंतर लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बजरंग म्हणाला की, "गरिबांची सेवा करणे हे माझे ध्येय आहे. माझ्या वडिलांसोबत घडलेल्या घटनेत मला असे दिसून आले की, गरीब आणि असहाय्य लोकांना मोठा अधिकारीच मदत करू शकतो. प्रत्येकजण एक समस्या सोडवण्यासाठी आयएएस होऊ शकत नाही, परंतु एखादी व्यक्ती आयएएस होऊन अनेक प्रश्न सोडवू शकते." 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी