शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

बालासोर अपघात: सुरक्षेकडे दुर्लक्ष, विरोधकांचा आरोप; खासगी बसमालकांकडून रेल्वे प्रवाशांची लूट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2023 5:26 AM

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर टीका करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

एस. पी. सिन्हा, लाेकमत न्यूज नेटवर्क, पाटणा: ओडिशातील भीषण रेल्वे अपघातानंतर राजकारण सुरू झाले आहे. यूपीए सरकारमध्ये रेल्वेमंत्री राहिलेले लालूप्रसाद यादव यांनी घटनेवर दु:ख व्यक्त करताना रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणावर टीका केली. या अपघाताची उच्चस्तरीय चाैकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. ‘राजद’नेही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर टीका करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ‘कवच’मध्येही काही झाले का? असा सवाल करून सरकारसाठी केवळ ‘वंदे भारत’मध्ये प्रवास करणारीच माणसे आहेत, अशी टीका केली. 

सुरक्षेकडे दुर्लक्ष : तृणमूलचा आराेप 

तृणमूल काॅंंग्रेसने रेल्वे अपघातावरून केंद्र सरकारवर टीका करतानाच प्रवाशांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचा आराेप केला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तसेच माजी रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, माझ्या कार्यकाळात रेल्वेगाड्यांमध्ये टक्करविराेधी उपकरण लावण्याचा निर्णय घेतला हाेता. ती आतापर्यंत लागलेले नाहीत.

तिकिटांचे दर वाढवाल तर खबरदार!

रेल्वे अपघातानंतर भुवनेश्वरवरून येणाऱ्या-जाणाऱ्या विमानांची अवास्तव भाडेवाढीवर लक्ष ठेवून असे प्रकार राेखण्याचे निर्देश नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिले आहेत.  अपघातामुळे तिकीट रद्द करणे किंवा प्रवासाच्या पुनर्नियाेजनासाठी काेणतेही अतिरिक्त शुल्क घ्यायला नकाे, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

खासगी बसमालकांकडून रेल्वे प्रवाशांची लूट

एकीकडे स्थानिक लोकांनी-तरुणांनी रक्तदानासाठी रात्रीच रुग्णालयांमध्ये धाव घेतली, तर दुसरीकडे खासगी बसमालकांकडून मात्र टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार समोर आला. अनेक ट्रेन रद्द झाल्यामुळे पश्चिम बंगालमधून 'जगन्नाथ स्नान यात्रा'साठी पुरीकडे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. बसचालकांनी भाडे अचानक दुप्पट किंवा तिप्पट केले. भद्रक, कटक आणि पुरीला नॉन-एसी बसमधून प्रवासासाठी साधारणतः अनुक्रमे ४००, ६०० आणि ८०० रुपये लागतात. त्याच प्रवासासाठी सुमारे १२०० ते १५०० रुपये, तर काही एजंटांनी २,००० ते २,५०० रुपयेही मागितल्याचे काही प्रवाशांनी सांगितले.

 

टॅग्स :Odisha Coromandel Express Accidentओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघात