शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला होता गोळीबार
2
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
3
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
4
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
5
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
6
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
7
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
8
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
9
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
10
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
11
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
12
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
13
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
14
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
15
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
16
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
17
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
18
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
19
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
20
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य

ई-रिक्षावरील बंदी कायम राहणार

By admin | Published: September 10, 2014 6:00 AM

अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार देशाची राजधानी दिल्लीत ई-रिक्षा चालविणे बेकायदेशीर असल्याचे सांगून दिल्ली उच्च न्यायालयाने ई-रिक्षावरील बंदी उठविण्याबद्दलची याचिका फेटाळली आहे.

नवी दिल्ली : अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार देशाची राजधानी दिल्लीत ई-रिक्षा चालविणे बेकायदेशीर असल्याचे सांगून दिल्ली उच्च न्यायालयाने ई-रिक्षावरील बंदी उठविण्याबद्दलची याचिका फेटाळली आहे.ई-रिक्षांना नियंत्रित करण्यासंदर्भातील नियम तयार होईस्तोवर ते चालू देण्याची केंद्र सरकारची विनंती नामंजूर केली. कायद्यानुसार ज्यावर बंदी आहे त्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे सांगून न्यायमूर्ती बी.डी. अहमद आणि न्यायमूर्ती सिद्धार्थ मृदुल यांनी ई-रिक्षावरील बंदी कायम ठेवली. ई-रिक्षा चालविण्याला परवानगी देण्यासाठी नियमात काय बदल करायचे ते केंद्र आणि संसदेला ठरवायचे आहे. अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार नोंदणी न झालेली ई-रिक्षा चालविणे बेकायदेशीर आहे. भविष्यात कायद्यात बदल करण्यात किंवा वैधानिक नियम बदलण्यात येतील याचा अंदाज बांधू शकत नाही. त्यावर संसद आणि केंद्र सरकारला विचार आणि कृती करायची आहे. त्यामुळे ३१ जुलैला देण्यात आलेला आदेश कायम ठेवण्यात येत आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाने ई-रिक्षाला बंदी घालण्याचा आदेश ३१ जुलैला दिला होता. त्याविरुद्ध बॅटरी रिक्षा वेलफेअर असोसिएशनने फेरविचार याचिका दाखल केली होती. या कायद्यामुळे फेरविचार याचिका निरर्थक असल्याचे न्यायालय म्हणाले. न्यायालयाने सामाजिक कार्यकर्ता शाहनवाज खान यांच्या याचिकेवर हा निर्णय दिला. खान यांनी ई-रिक्षाला बंदी घालण्याची विनंती केली होती. कुणालाही वैध परवान्यांशिवाय ई-रिक्षा चालविण्याची परवानगी दिली जाऊ नये, असे खान यांनी म्हटले होते. ई-रिक्षांचा नोंदणी क्रमांक नाही तसेच ते प्रवाशांचे जीव धोक्यात घालू शकते, असेही ते म्हणाले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)