शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
2
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
3
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
4
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
5
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
6
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
7
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
8
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
9
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
10
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
11
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
12
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
13
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
14
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
15
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
16
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
17
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
18
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
19
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
20
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा

आंदोलनात टायर जाळण्यास बंदी - राजकीय पक्षांना चाप

By admin | Published: September 12, 2014 2:05 PM

नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलने (राष्ट्रीय हरित न्यायाधीकरण) दिलेल्या निर्णयानुसार आंदोलनादरम्यान टायर्स जाळण्यावंर बंदी घालण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १२ - राजकीय आंदोलनांच्या दरम्यान रस्यावर उतरणा-या आणि वाहनांचे टायर्स जाळून आग व धुराचे भीतीदायक वातावरण करणा-या नेत्यांना व कार्यकर्त्यांना आता चाप बसणार आहे. पर्यावरणाची हानी करणा-या टायर्स जाळण्यासारख्या कृत्यांना नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलने (राष्ट्रीय हरित न्यायाधीकरण) बंदी घातली आहे. पर्यावरणाची रक्षा करणारा हा निर्णय शुक्रवारी देण्यात आल्याचे अ‍ॅड. असीम सरोदे यांनी सांगितले.
एखाद्या आंदोलनादरम्यान राजकीय पक्ष अथवा धार्मिक गट विरोधकांचा निषेध करताना घोषणांबरोबरच सार्वजनिक वाहनांची नासधूस करतात. तसेच आंदोलनाची तीव्रता जास्त वाटावी यासाठी टायर्स जाळतात. त्यातून निघणा-या विषारी धुरामुळे पर्यावरणास हानी तर पोहचतेच तसेच संबंधित परीसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीवर निर्णय देताना राष्ट्रीय हरीत न्यायाधीकरणाने टायर जाळण्यास बंदी घातल्याचे सरोदे यांनी सांगितले.
या निर्णयामुळे मोकळ्या जागांमध्ये रहिवासी परिसर आणि शाळा, रुग्णालये व कार्यालये अशा सर्व सार्वजिनक ठिकाणी टायर जाळणे यापुढे बेकायदेशीर समजण्यात येईल.  तसेच जो कोणी या आदेशांचे पालन करणार नाही त्यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम १८८ ( शासकीय आदेशाचा अपमान) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात यावा असे न्यायाधीकरणाने स्पष्ट केले आहे. 
नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल अ‍ॅक्ट २०१०च्या  कलमानुसार या आदेशाचे उल्लंघन करणा-यास तीन वर्षे कारावास किंवा १० कोटी रुपयांचा दंड आकारण्यात येऊ शकतो. तसेच हा गुन्हा दुस-यांदा केल्यास २५ कोटी रुपयांचा दंडही आकारला जाऊ शकतो.