शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
2
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
3
पावसाचा कहर! उत्तर प्रदेशमध्ये ८ जणांचा मृत्यू; अनेक घरांची पडझड, ३०० गावांतील वीज खंडित
4
है तय्यार हम! T20 वर्ल्ड कपसाठी सरावाचा श्रीगणेशा; एका ट्रॉफीसाठी १० संघ मैदानात, PHOTOS
5
IDFC first Bank मध्ये IDFC Ltd चे होणार विलीनीकरण; गुंतवणूकदारांचा कसा होणार फायदा?
6
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच
7
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
8
Sunil Tatkare on BJP Mahayuti: "भाजपा मित्रपक्षांना सन्मानाने वागवतो याचं उदाहरण म्हणजे..."; सुनील तटकरेंनी थेट पुरावाच दिला
9
मुशीर खानचा भीषण अपघात! मुंबईच्या संघाला मोठा झटका; BCCI ने दिली महत्त्वाची माहिती
10
सलमानसोबत हिट सिनेमा, मात्र करिअरमध्ये अभिनेत्री ठरली अपयशी, १२ वर्षांपासून आहे कलाविश्वातून गायब
11
हिजबुल्लाह चीफ हसन नसरल्लाह 'खतम'! मुलीचाही मृत्यू; इस्रायली लष्कराचा मोठा दावा
12
Investment Tips : गुंतवणूकदारांसाठी आली सुरक्षित गुंतवणुकीची संधी, सरकार उभारणार २० हजार कोटी, तुम्हालाही संधी मिळणार
13
IND vs BAN, 2nd Test Day 2 : एकही चेंडू नाही फेकला अन्.. ९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
14
काँग्रेसच्या कटकटी थांबेना! जाहीरनाम्याच्या कार्यक्रमाकडे शैलजा-सुरजेवालांची पाठ
15
Som Pradosh 2024: पितृपक्षात सोम प्रदोष व्रताची संधी म्हणजे दुप्पट लाभ; अवश्य करा 'ही' एक कृती!
16
मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त
17
फवाद खानच्या पाकिस्तानी सिनेमाला भारतात बंदीच! 'द लीजेंड ऑफ मौला जट' प्रदर्शित होणार नाही, कारण...
18
'या' सरकारी कंपनीला १०० कोटी रुपयांची ऑर्डर; Adani समूहासाठी करणार काम
19
महिलांना दरमहा ₹2 हजार, 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार अन्...; हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा
20
Exclusive: दीड वर्षाच्या मुलासोबत कसं केलं शूट? प्रिया बापटने सांगितली 'रात जवां है'च्या सेटवरची धमाल-मस्ती

बांगला सीमा २ वर्षांत सील करणार - सोनोवाल

By admin | Published: May 22, 2016 3:00 AM

घुसखोरी रोखण्यासाठी बांगलादेशलगतची आसामची सीमा आगामी दोन वर्षांत सील केली जाईल, असे भावी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितले.

गुवाहाटी : घुसखोरी रोखण्यासाठी बांगलादेशलगतची आसामची सीमा आगामी दोन वर्षांत सील केली जाईल, असे भावी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितले. भाजपाने निवडणुकीत घुसखोरीचा प्रश्न प्रचाराचा मुद्दा बनविला होता.घुसखोरी आणि ती रोखण्याचे प्रयत्न हे आपल्या सरकारसमोरील सर्वांत महत्त्वाचे प्रश्न असतील, असे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, सीमेवर कायमस्वरूपी कुंपण घालण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी २ वर्षांची मुदत दिली आहे. त्या मुदतीच्या आतच कुंपण घालण्याचे काम आम्ही पूर्ण करू . यंदा जानेवारीतच राजनाथसिंह यांनी आसामच्या करीमगंज जिल्ह्यात भारत-बांगलादेश सीमेचा दौरा केला होता. त्यात त्यांनी त्या भागात काटेरी कुंपण घालण्याचे काम वर्षअखेरपर्यंत पूर्ण केले जाईल, असे सांगितले होते. कुंपण घालताच घुसखोरी आपोआपच थांबेल, असे राजनाथ यांनी त्यावेळी सांगितले होते. बांगलादेशातून घुसखोरी रोखण्यासाठी कोणती प्रणाली अमलात आणणार की कायदा करणार, असे विचारले असता सोनोवाल म्हणाले की, आसाममध्ये राष्ट्रीय नागरिकता रजिस्टरमध्ये (एनआरसी) सुधारणा चालू आहे. त्याचे अंतिम प्रारूप जाहीर झाल्यानंतर कोण नागरिक आहे आणि कोण घुसखोर आहे हे समजू शकेल. त्यावेळी सध्याच्या कायद्यानुसार घुसखोरांवर कारवाई केली जाईल.