शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बांगलादेश सरकारची हिंदूंबाबत काय भूमिका आहे? परराष्ट्र सचिवांनी सांगितलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 23:29 IST

बैठकीनंतर समितीचे अध्यक्ष आणि काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले की, परराष्ट्र सचिव अलीकडेच बांगलादेशला गेले होते, जेणेकरून ते समितीला ताजी माहिती सांगू शकतील.

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात हिंदूवर अत्याचार होत आहेत. याच पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाशी संबंधित संसदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यांनी भारत-बांग्लादेश संबंधांची सविस्तर माहिती दिली. यावेळी बांगलादेशातील अल्पसंख्याकांवरील हिंसाचार, द्विपक्षीय करार आणि तेथील राजकीय परिस्थिती या विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर समितीचे अध्यक्ष आणि काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले की, परराष्ट्र सचिव अलीकडेच बांगलादेशला गेले होते, जेणेकरून ते समितीला ताजी माहिती सांगू शकतील.

परराष्ट्र सचिवांनी सांगितले की,बांगलादेशने अल्पसंख्याकांवरील हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, बांगलादेश सरकारने या घटनांना दिशाभूल करणारी आणि खोटी माहिती असल्याचे म्हटले असून भारताने आपल्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये, असे आवाहन केले आहे. तसेच, परराष्ट्र सचिवांनी सांगितले की, बैठकीत बहुतेक सदस्यांनी कोणत्याही पक्षाची पर्वा न करता शेख हसीना यांच्या भारतातील वास्तव्याबद्दल विचारपूस केली.

बैठकीत उपस्थित खासदारांनी अनेक प्रश्न विचारले, त्यापैकी सर्वात महत्त्वाचा प्रश्न बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या भारतातील राहणीमानावर होता. मात्र, परराष्ट्र सचिवांनी यावर कोणतीही जाहीर प्रतिक्रिया दिलेली नाही. समितीचे खासदार बांगलादेशला भेट देऊ शकतात, असेही शशी थरूर यांनी सुचवले. याशिवाय, भूतानला भेट देण्याच्या शक्यतेवरही चर्चा झाली. भारत आणि बांगलादेशमधील सांस्कृतिक, धार्मिक आणि राजनैतिक संपत्तीवरील हल्ल्यांबाबत भारताच्या चिंतेवरही बैठकीत चर्चा करण्यात आली.

भारत आणि बांगलादेशच्या परराष्ट्र सचिवांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीतही हे मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. बांगलादेशचे परराष्ट्र सचिव मोहम्मद जसिम उद्दीन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबद्दल आणि कल्याणाबाबत भारताने चिंता व्यक्त केल्याचे विक्रम मिश्री यांनी सांगितले. तसेच, या बैठकीत भारताने सांस्कृतिक आणि धार्मिक स्थळांवरील हल्ल्यांच्या घटनांबाबत आपले आक्षेप नोंदवले होते. बांगलादेश प्रशासन या मुद्द्यांवर विधायक दृष्टिकोन स्वीकारेल आणि दोन्ही देशांमधील संबंध सकारात्मक दिशेने पुढे नेतील, अशी आशा विक्रम मिश्री यांनी व्यक्त केली.

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारतShashi Tharoorशशी थरूर