शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Visarjan 2024 Live : गणपती चालले गावाला... मुंबई, पुण्यासह राज्यभरात बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू
2
"जमलेल्या माझ्या हिंदू बांधवांनो..."; उद्धव ठाकरेंची पुन्हा 'भगवी' साद, मनात नेमकं काय?
3
मनोज जरांगेंनी पुन्हा उपसलं उपोषणाचं हत्यार; सरकारची डोकेदुखी वाढणार?
4
एक अशी महिला, ज्यांच्या समोर ३,३६,००० कोटींच्या कंपनीलाही झुकावं लागलं; नियम बदलून रचला इतिहास
5
हिऱ्याच्या पोटी गारगोटी, बाळासाहेबांच्या नावाला कलंक; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
6
गणपती निघाले गावाला... मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, पालघरला विसर्जनासाठी सर्व यंत्रणा सज्ज
7
दीपिकाचा एकही सिनेमा पाहिला नाही, नवाजुद्दीन सिद्दीकीचं आश्चर्यकारक विधान; 'स्त्री'बद्दल म्हणाला...
8
Stock Market Opening: US फेडच्या बैठकीपूर्वी शेअर बाजारात बुलिश ट्रेंड, 'ही' लेव्हल पार केली तर येऊ शकते मोठी तेजी
9
"अशा पद्धतीने माणसांना अपमानित करून बाहेर काढणे हेच 'नवं शैक्षणिक धोरण' आहे का?"
10
Dolly Chaiwala : 'डॉली चायवाला'ची फी ऐकून फुटेल घाम! मॅनेजर ठरवतो डील्स; मागण्यांचीही मोठी यादी
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी-व्यवसायात यश मिळण्याची शक्यता अधिक!
12
कोण आहे अमानत? जी होणार केंद्रीय कृषिमंत्र्यांची मोठी सून; चौहान कुटुंब आनंदात
13
आता अरबाज घराबाहेर जाईल! नॉमिनेशन टास्कनंतर अभिजीतचं स्पष्ट मत, म्हणतो- "तो फक्त निक्कीच्या..."
14
परीक्षांच्या तारखा जाहीर करा, शरद पवार यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
15
गिरीश महाजनांना धक्का, भाजपानं डावलल्याचा आरोप; निष्ठावंत नेता 'तुतारी' हाती घेणार
16
'बिग बॉस मराठी'नंतर 'बिग बॉस हिंदी'चा नवा सीझन येणार, सलमानच्या आवाजातील प्रोमो समोर, थीमही आहे खास
17
‘राजपुत्र’ विधानसभेत नशीब अजमावणार? विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली
18
अवघड गणित होणार सोपे! शिक्षण विभाग शाळांमध्ये राबविणार गणित सात्मीकरण प्रणाली
19
राहुल गांधींवर वादग्रस्त वक्तव्य भोवलं, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल
20
‘कुनो’मध्ये परदेशी पाहुण्यांची होतेय हेळसांड; सिंहांच्या पुनर्वसनासाठी कोणतेच प्रयत्न झाले नाहीत

'पॅलेस्टाईनवर रडणारे हिंदूंच्या हत्याकांडावर गप्प', गिरीराज सिंह यांचा इंडिया आघाडीवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2024 10:23 PM

Bangladesh Protest: बांग्लादेशातील हिंसाचारात हिंदूंना टार्गेट केले जात आहे. अनेक मंदिरेही तोडण्यात आली आहेत.

Bagladesh Crisis News : बांग्लादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सुरू झालेले आंदोलन हळुहळू हिंसाचारात बदलले. या हिंसाचारामुळे शेख हसीना यांना आपले पंतप्रधानपद सोडून देशातून पलायन करावे लागले. दरम्यान, या हिंसाचाराच्या आगीत देशातील अल्पसंख्याक हिंदूंना टार्गेट केले जात आहे. आतापर्यंत अनेक मंदिरे तोडण्यात आली असून, हिंदूंच्या घरांवरही हल्ले होत आहेत. यावरुन केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी इंडिया आघाडीवर निशाणा साधला आहे. 3

गिरीराज सिंह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट लिहून विरोधकांवर टीका केली. ते म्हणतात, "India आघाडीचे लोक पॅलेस्टाईनवरुन रडत होते आणि आता बांग्लादेशात होत असलेल्या हिंदूंच्या नरसंहारावर गप्प आहेत. त्यांची धर्मनिरपेक्षता हिंदूंच्या वेदनांवर मरते," अशी बोचरी टीका त्यांनी केली. दरम्यान, या घटनेवरुन परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आज संसदेत निवेदन दिले. त्यांनी सांगितले की, भारत या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे.

हिंदूंवरील हल्ले वाढलेसुरुवातीला बांग्लादेशातील अल्पसंख्याकांवर, मुख्यत: हिंदूंविरुद्ध हिंसाचाराच्या तुरळक बातम्या आल्या, पण लवकरच त्यात वाढ होऊ लागली. ढाक्यातील वृत्तवाहिन्यांवरही हिंसाचाराच्या बातम्या आल्या; अल्पसंख्याकांसाठी काम करणाऱ्या संघटनांनी सोशल मीडियावर मदतीचे आवाहन केले. बांग्लादेशातील खुलना विभागातील मेहेरपूर येथील इस्कॉन मंदिराची सोमवारी आंदोलकांनी तोडफोड आणि आग लावली. हिंदूंच्या घरांना लक्ष्य करण्यात आले आणि अगदी महिला आणि तरुण मुलींना पळवून नेण्यात आले.

अमित शाहंनी बोलावली बैठक बांग्लादेशातील सतत बिघडत चाललेल्या परिस्थितीवर गृहमंत्री अमित शाह यांनी आज महत्त्वपूर्ण बैठक घेतली. संसद भवनात झालेल्या या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, एनएसए अजित डोवाल आणि गृह सचिव यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत बांग्लादेशातील परिस्थिती आणि सीमा सुरक्षा यावर चर्चा झाली. दरम्यान, भारत बांग्लादेशच्या लष्करप्रमुखांच्या संपर्कात असून, तेथील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करत असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी दिली आहे.

भारत-बांग्लादेश सीमा सीलबांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) सतर्क आहे. बीएसएफने सोमवारीच 4,096 किमी लांबीच्या भारत-बांग्लादेश सीमेवरील सर्व युनिट्ससाठी हाय अलर्ट जारी केला असून, संपूर्ण सीमा सील करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, बांग्लादेशची सर्वाधिक 2200 किमी लांबीची सीमा पश्चिम बंगालशी लागून आहे आणि हाच भाग अत्यंत संवेदनशील आहे. ताज्या घडामोडी लक्षात घेऊन बीएसएफचे कार्यवाहक महासंचालक (डीजी) दलजित सिंग चौधरी यांनी मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी भारत-बांग्लादेश सीमेचा दौरा करुन परिस्थितीचा आढावा घेतला.

बांग्लादेशातील हिंदू लोकसंख्या घटलीशेख हसीना यांच्या काळात बांग्लादेशातील अल्पसंख्याकांना टार्गेट केले गेले नाही, असे नाही, पण ते रोखण्यात त्यांना यश आले. आता त्यांनाच देश सोडावा लागल्यामुळे या घटना उघडपणे घडू लागल्या आहेत. आज बांग्लादेशात हिंदूंची लोकसंख्या 8 टक्के आहे, जी 1947 च्या तुलनेत खूपच कमी आहे. त्यावेळी हिंदू लोकसंख्या 30 टक्के होती.

टॅग्स :BangladeshबांगलादेशINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीIndiaभारतcongressकाँग्रेसBJPभाजपा