शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
2
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
3
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
6
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
7
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
8
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
9
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
10
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
11
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
12
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
13
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
14
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
15
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
16
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
17
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
18
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
19
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
20
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय

"स्वातंत्र्याला हलक्यात घेऊ नका, शेजारच्या देशाकडे बघा"; बांगलादेशबाबत सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 7:31 PM

बांगलादेशात हिंसाचारानंतर झालेल्या सत्तातरावरुन र्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे.

CJI DY Chandrachud: बांगलादेशात शेख हसीना यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर पंतप्रधान पद सोडून देशातून पळ काढला. हसीना यांच्या राजीनाम्यानंतर बांगलादेशचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी देशाची सुत्रे हातात घेतली आहे. बांगलादेशात आरक्षणविरोधी आंदोलनात शेकडो लोकांचा बळी गेला. हसीना यांच्या राजीनाम्यानंतर बांगलादेशमध्ये हिंदूना लक्ष करण्यात आलं. या सगळ्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी भाष्य केले आहे. भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित करताना सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी बांगलादेशबाबत महत्त्वाचे विधान केले.

बांगलादेशात सत्ताबदल झाल्यानंतर अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसाचाराच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. बांगलादेशात हिंसाचाराच्या घटनांमुळे चिंतेचे वातावरण असताना भारताने आज ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. यानिमित्ताने सर्वोच्च न्यायालयातही ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी बांगलादेशातील नुकत्याच घडलेल्या घटनांबाबत भाष्य केलं. अनेक वकिलांनीही स्वातंत्र्याच्या लढ्यात देशासाठी सर्वस्व अर्पण केले. व्यावसायिक वकिलांनी कायदेशीर पेशा सोडून स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्याचा घेतलेला निर्णय हे एक प्रेरणादायी उदाहरण आहे, असं सरन्यायाधिश चंद्रचूड म्हणाले.

“आपण १९५० मध्ये संविधान स्वीकारले. मात्र शेजारच्या राष्ट्रात स्वातंत्र्य अनिश्चित होते. त्याचा परिणाम काय झाला? हे आपण बांगलादेशमध्ये पाहू शकतो. याच्यातून स्वातंत्र्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. स्वातंत्र्याला गृहीत धरणे खूप सोपे असते. पण या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत, हे भूतकाळातील प्रसंगावरून ओळखले पाहीजे,” असं सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटलं.

"आज सकाळी मी कर्नाटकातील एका गायिकेचा 'साउंड्स ऑफ फ्रीडम' नावाचा लेख वाचत होतो. आज अनेक तरुण वकील स्वातंत्र्यानंतरच्या पिढीतील आहेत. पण तुमच्यापैकी बरेच जण आणीबाणीनंतरच्या पिढीतील आहेत. वकील आपल्या देशात एक शक्ती आहेत. न्यायालये अधिकार आणि स्वातंत्र्य जिवंत ठेवण्यासाठी काम करतात. न्यायालयाचे सदस्य हे न्यायाधीश यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहेत. ते आम्हाला लोकांच्या वेदना पाहण्याची संधी देतात," असेही सरन्यायाधीश म्हणाले.

दरम्यान, बांगलादेशातील परिस्थितीवर सरन्यायाधीशांचे भाष्य देखील महत्त्वाचे आहे कारण बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदू समुदायावर मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत. भारतानेही यावर चिंता व्यक्त केली आहे. सध्या बांगलादेशमध्ये मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले आहे. नोबेल शांतता पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांच्या या सरकारमध्ये १७ सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनSupreme Courtसर्वोच्च न्यायालयDY Chandrachudडी. वाय. चंद्रचूडBangladeshबांगलादेश