शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

मोठी बातमी! भारतात शरण येण्यासाठी हजारो हिंदू बांगलादेशच्या सीमेवर जमले, काय घडतंय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 19:32 IST

बांगलादेशात सुरु असलेल्या हिंसक आंदोलनात अनेक अल्पसंख्याकांवर हल्ले सुरू आहेत.

कूचबिहार - बांगलादेशात सध्या हाहाकार माजला असून याठिकाणी हिंसक आंदोलनकर्ते हिंदूंना लक्ष्य करत आहेत. हिंदू समुदायाची घरे, मंदिरांवर बांगलादेशात हल्ले सुरू आहेत त्यामुळे बांगलादेशात राहणारा हिंदू भारत बांगलादेश सीमेवर कूचबिहार जिल्ह्यातील काटेरी तारांच्या पलीकडे मोठ्या संख्येने जमले आहेत. ही परिस्थिती पाहता बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या १५७ तुकड्या सीमेवर तैनात करण्यात आल्या आहेत.

बांगलादेशात राहणारे हिंदू काटेरी ताऱ्यांपासून ४०० मीटर अंतरावर गैबंडा जिल्ह्यातील गेंडुगुरी, दैखवा गावात एकत्रित आले आहेत. शुक्रवारी सकाळपासून हे लोक इथं जमण्यास सुरुवात झाली. दुसरीकडे कूचबिहारच्या सीमेअलीकडे शीतलकुचीच्या पठानटुली गावात बीएसएफच्या जवानांची संख्या वाढवण्यात आली आहे. या परिस्थितीवर जवान करडी नजर ठेवून आहेत. 

सरकारनं केलं समितीची स्थापना

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बांगलादेशात सुरु असलेल्या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भारत-बांगलादेश सीमेवर देखरेख ठेवण्यासाठी समितीची स्थापना केली आहे. ही समिती बांगलादेशातील समकक्ष अधिकारी यांच्याशी संपर्कात राहतील. जेणेकरून तिथे राहणाऱ्या भारतीय नागरीक, हिंदू आणि अन्य अल्पसंख्याकांच्या सुरक्षेची हमी घेतली जाईल. या समितीचं अध्यक्षपद एडीजी, सीमा सुरक्षा दलाचे माजी अध्यक्ष करतील. समितीच्या अन्य सदस्यांमध्ये महानिरिक्षक,बीएसएफ फ्रंटियर मुख्यालय दक्षिण बंगाल, महानिरिक्षक, बीएसएफ फ्रंटियर मुख्यालय त्रिपुरा आणि अन्य लोक असतील.

हजारो बांगलादेशी हिंदूही जलपाईगुडी येथे जमले

याआधी पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी इथं भारत बांगलादेश बॉर्डरवर १ हजाराहून अधिक बांगलादेशी हिंदू पोहचले आहेत. त्यांना भारताच्या सीमेत प्रवेश करायचा आहे. मात्र भारताने बेकायदेशीर घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. या प्रकारामुळे भारत-बांगलादेश सीमेवर जवानांची संख्या वाढवण्यात आली आहे. 

भारतानं शरण देण्याची मागणी

बॉर्डर पलीकडे एकत्रित जमलेले बांगलादेशी हिंदूंनी म्हटलं की, आमची घरे, मंदिरे जाळण्यात येत आहेत त्यामुळे आम्हाला भारतात शरण यायचं आहे. मात्र भारतात इतक्या मोठ्या संख्येने शरण येण्यासाठी जमलेल्या लोकांना भारतीय जवानांनी सीमेवरच रोखून धरले आहे.  

टॅग्स :IndiaभारतBangladeshबांगलादेशBSFसीमा सुरक्षा दल