शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

राम मंदिर भूमिपूजनाचे औचित्य साधून 50 मुस्लीम कुटुंबीयातील 250 सदस्यांनी स्वीकारला हिंदू धर्म!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 13:00 IST

राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यातील पायला कल्ला पंचायत समितीच्या मोतीसरा गावात राहणाऱ्या 50 मुस्लीम कुटुंबीयांनी हिंदू धर्म स्वीकारला.

ठळक मुद्देराम मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर या कुटुंबीयांनी गावच्या सरपंचांना बोलावून हवन केला. कुटंबीयांतील सर्वांची नावे हिंदू धर्मानुसार आहेत.

जयपूर : अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा बुधवारी पार पडला. याचदरम्यान, राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यातील पायला कल्ला पंचायत समितीच्या मोतीसरा गावात राहणाऱ्या 50 मुस्लीम कुटुंबीयांनी हिंदू धर्म स्वीकारला. हिंदू धर्म स्वीकारणार्‍या कुटुंबातील वयस्कर लोकांचे म्हणणे आहे की, त्यांचे पूर्वज हिंदू होते. इतिहासाचे ज्ञान असल्यामुळे त्यांनी कोणत्याही दबावाशिवाय स्वेच्छेने हिंदू धर्म स्वीकारला आहे.

हिंदू धर्माचे स्वीकार करणारे सुभनराम यांनी सांगितले की, "मुघल काळात त्यांच्या पूर्वजांना धमकावून मुस्लीम धर्म स्विकारण्यास भाग पाडले होते. मात्र याबाबत कळल्यानंतर आम्ही हिंदू आहोत आणि आम्हाला पुन्हा याच धर्मात जायचे आहे, असे ठरवले. तर, मुस्लिम आपल्यापासून अंतर ठेवतात. आमच्या प्रथा संपूर्ण हिंदू धर्माशी संबंधित आहेत. यानंतर संपूर्ण कुटुंबाने हिंदू धर्मात परत जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर 50 मुस्लीम कुटुंबीयांतील 250 सदस्यांनी होम-हवन करून हिंदू धर्माचा स्वीकार केला."

गावातील हरजीराम यांच्या म्हणण्यानुसार, कांचन ढाढ़ी जातीचे हे संपूर्ण कुटुंब बर्‍याच वर्षांपासून हिंदू रूढी-परंपरा  पाळत होते. दरवर्षी ते आपल्या घरात हिंदू सण साजरे करतात. याच कुटुंबीयातील विंजारम यांनी सांगितले की, "मुस्लीम रीति-रिवाजांनुसार आम्ही कोणतेही धार्मिक कार्य केले नाही. रामजन्मभूमी येथे राम मंदिराच्या भूमिपूजनावेळी आम्ही सर्वांनी होम-हवनचा कार्यक्रम आयोजित केला आणि हिंदू संस्कृतीचा पाठपुरावा करून स्वेच्छेने हिंदू धर्मात परतलो. यासाठी कोणाचाही दबाव नाही."

राम मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर या कुटुंबीयांनी गावच्या सरपंचांना बोलावून हवन केला. कुटंबीयांतील सर्वांची नावे हिंदू धर्मानुसार आहेत. विंजाराम यांनी सांगितले की, त्यावेळी त्यांच्या पूर्वजांना जबरदस्ती मुस्लीम धर्माचा स्वीकार करण्यास भाग पाडले होते. मात्र आता घरातील शिक्षित पिढीने हिंदू धर्माचा स्वीकार केला आहे. तसेच, हा निर्णय कोणाच्याही दबावाखाली येऊन घेतला नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

याचबरोबर, या कुटुंबातील सदस्य हरुराम यांनी सांगितले की, सध्या जगावर कोरोनाचे मोठे संकट आहेत. यातच राममंदिराचे भूमिपूजन झाले, या ऐतिहासिक क्षणाने सर्वांना आनंद दिला. आम्हीही घरात दिवे लावून, होम हवन करून हा दिवस साजरा केला. तर गावचे सरपंच प्रभुराम कलबी यांनी सांगितले की, या सर्वांनी स्वत: हिंदू धर्माचा स्वीकार केला आहे. भारतीय संविधानानुसार कोणतीही व्यक्ती कोणताही धर्म स्वीकारू शकते. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याRajasthanराजस्थान