शहरं
Join us  
Trending Stories
1
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
2
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
3
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
4
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
5
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
6
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
7
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
8
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
9
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
10
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
11
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
12
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
13
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
14
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
15
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
16
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
17
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
18
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
19
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
20
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?

मोबाइलमुळे मुलांना 30 शब्दही लिहिणे कठीण; पालकांना लागली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 6:51 AM

गाेष्टी तर आठवतात, पण मांडण्यात अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोरोना काळात ऑनलाइन अभ्यासामुळे मुलांना मोबाइलचे लागलेले व्यसन धोकादायक ठरत आहे. याचा परिणाम म्हणजे आता मुलांना शिक्षक जे शिकवतात त्यावर तसेच विषय समजून घेताना त्यावर लक्ष केंद्रित करताना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मुलांना गोष्टी आठवतात पण ३० शब्दही लिहिणे कठीण जात असल्याने पालकांच्या चिंता वाढल्या आहेत.

अनेक लहान मुले अशी आहेत ती अतिशय उत्तम विचार व्यक्त करतात, पण ते त्या गोष्टी मांडू शकत नाहीत. यामुळे त्यांच्यावर मानसिक दडपण तर वाढत आहेच शिवाय त्यांना परीक्षेत चांगले मार्कही मिळत नाहीत. बहुतांश मुलं मोबाइलमध्ये बोलून गोष्टी शोधतात, यामुळे ते लिहिण्यापासूनही दूर जात असल्याचे समोर आले आहे.

पाच ते आठ वर्षांच्या मुलांना केवळ दहा ते तीस शब्दांची उत्तरे लिहिण्यात अडचण येत आहे. गणित सोडवणे, इंग्रजी लेखन आणि हिंदी या विषयात त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. हे त्यांच्या हातात मोबाइल दिल्यामुळे झाल्याचे परिणाम आहेत. मुले फक्त सरावानेच स्पष्ट, चांगले लिहायला शिकतात. जितका सराव जास्त तितके लेखन चांगले होईल,असे मत बरखा जैन या शिक्षिकेने व्यक्त केले.

मुले लिहिताना बोटात दुखत असल्याची तक्रार करीत आहेत. जास्त कीबोर्ड वापरल्याने किंवा चार ते पाच पाने लिहिल्याने त्यांचे हात दुखायला लागतात. पेन वा पेन्सिल खूप घट्ट धरल्यानेही नसांमध्ये तणाव निर्माण होतो. सरावाने सर्वकाही हळूहळू बरोबर होते. - डॉ. रजत भार्गव, फिजिओथेरपिस्ट 

केस १ : कुनिका (वय ८)

चौथीत शिकते. सर्व विषयांची उत्तरे तोंडपाठ आहेत. तरीही तिला परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले. पालकांनी उत्तरपत्रिका पाहिली असता अनेकांची उत्तरे तिने बरोबर लिहिलेली नसल्याचे लक्षात आले. हस्ताक्षर देखील खूप खराब होते जे वाचणे कठीण होते.

केस २ : आस्था (१२)

हिला बऱ्याच गोष्टी आठवतात. लिहिताना बोटात ताण आल्याने लिहिणे कमी होऊ लागले. याला कार्पल टनल सिंड्रोम झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.अल्ट्रासाऊंड आणि टेन्सने तपासल्यानंतर तो औषधांनी बरा झाला.

पालकांनी काय करायला हवे?

n मुलांना पत्र लिहिण्यास किंवा कथा लिहिण्यास सांगा.n एखाद्या ठिकाणाचा वा गोष्टीचा अनुभव लिहून दाखवा.n कविता व कथा लिहायला लावा.n मुलांना एखाद्या विषयाबद्दल काय वाटते ते लिहा.n लिहिण्यास सोयीस्कर पेन आणि पेन्सिल द्या.

टॅग्स :MobileमोबाइलHealthआरोग्य